20 फेब्रुवारी 2018 रोजी हिंदू रितीरिवाजानुसार झालेल्या एका विवाहाने काही महिन्यांतच ट्विस्ट घेतला. बायकोनं केवळ आठ महिन्यांनंतरच पतीपासून विभक्त होऊन न्यायालयात पोटगीसाठी अर्ज केला. बायकोनं आरोप केला की, नवऱ्यानं तिला मानसिक त्रास दिला, देखभाल खर्च दिला नाही आणि हुंड्यासाठी त्रास दिला. त्या परिस्थितीत तिने दरमहा 25,000 रुपये पोटगी मिळावी, अशी मागणी केली.
advertisement
पतीने पत्नीच्या याचिकेला विरोध केला. त्याने सांगितले की पत्नी डॉक्टर असून दरमहा 45,000 रुपये कमावते, त्यामुळे तिला पोटगीची आवश्यकता नाही. त्यानुसार, पत्नी कोणत्याही योग्य कारणाशिवाय वेगळी राहत आहे. ट्रायल कोर्टाने या प्रकरणात साक्षीदार आणि पुरावे पाहिल्यानंतर पत्नीची याचिका फेटाळली.
पतीने हेही नमूद केले की, त्याच्या आई-वडिलांची जबाबदारी त्याच्यावर आहे आणि आर्थिक दृष्टिकोनातून तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
पत्नीने हायकोर्टात दिले आव्हान
ट्रायल कोर्टाचा निर्णय न पटल्यानं बायको हायकोर्टात गेली. तिने सांगितले की, जरी तिने होमिओपॅथिक प्रॅक्टिसला सुरुवात केली असली तरी देखील प्रत्यक्षात ती सध्या बेरोजगार आहे आणि MD (होमिओपॅथिक) च्या शिक्षणासाठी डिसेंबर २०२३ पासून महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. कोविड-१९ काळात तिने तात्पुरते काही सेवा दिल्या होत्या, परंतु त्या संपला आहेत, आता तिला सध्या पुरेसा पगार मिळत नाही.
त्याने तर्क दिला की, ट्रायल कोर्टाने तिला “पुरेशा कारणांशिवाय वेगळी राहते” असे मानणे चुकीचे ठरले आहे. विवाह हा फक्त कायदेशीर बंधन नाही तर पारस्परिक सहकार्याचे नाते आहे, असे हायकोर्टाने स्पष्ट केले.
हायकोर्टाचा निर्णय आणि पोटगी
हायकोर्टाने पाहिले की पत्नीला तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत देणे आवश्यक आहे. पतीच्या आर्थिक क्षमतेचा विचार करून, कोर्टाने दरमहा 15,000 रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. हा आदेश अर्जाच्या तारखेपासून लागू होईल आणि पूर्वी मिळालेली काही अंतरिम पोटगी समायोजित केली जाईल. ही घटना मध्य प्रदेशातील रतलाममधील आहे.
कोर्टाने हेही स्पष्ट केले की, पत्नीने शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी मिळवली किंवा परिस्थितीत बदल झाला, तर पोटगीमध्ये सुधारणा करण्यासाठी कोर्टात पुन्हा अर्ज करता येईल.
हा निकाल स्त्रियांच्या हक्कांसाठी आणि वैवाहिक नात्यातील समानतेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. कोर्टाने स्पष्ट केले की, विवाहात पतीच्या जबाबदारीइतकेच पत्नीच्या अधिकारांचीही जाणीव ठेवली पाहिजे. शिक्षण पूर्ण करणे, आर्थिक स्वावलंबन आणि पोटगी मिळणे ही प्रत्येक स्त्रीची नैसर्गिक गरज आहे.