TRENDING:

उन्हाळी सुट्ट्यांत प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वेवर 8 विशेष गाड्या धावणार, चेक करा वेळापत्रक

Last Updated:

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ही महत्त्वाची पावले उचलली असून प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 8 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विदर्भ, कोकण आणि गोवा या भागांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे नियमित गाड्यांवर ताण येऊन तिकिटांची कमतरता भासते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ही महत्त्वाची पावले उचलली असून प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
News18
News18
advertisement

या विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर, पुणे ते नागपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या महत्त्वाच्या मार्गांवर धावणार आहेत. हे मार्ग प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत गजबजलेले असून सुट्ट्यांच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी गर्दी होते. त्यामुळे या अतिरिक्त गाड्यांमुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी होऊन अधिक प्रवाशांना आरक्षण मिळण्याची शक्यता वाढणार आहे.

advertisement

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, वडाळ्यात 2 महिने वाहतूक बदल, या पर्यायी मार्गाचा करा वापर

लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान 01021 आणि 01022 या क्रमांकाच्या विशेष गाड्या प्रत्येकी एक फेरी करतील. 3 एप्रिल रोजी पहाटे 00.55 वाजता सुटणारी गाडी दुपारी 15.45 वाजता नागपूरला पोहोचेल, तर परतीची गाडी त्याच दिवशी रात्री 20.00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वाजता टर्मिनसला पोहोचेल. या मार्गावर ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला आणि वर्धा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे दिले जाणार आहेत.

advertisement

View More

तसेच पुणे ते नागपूर दरम्यान 01467 आणि 01468 या गाड्यांचीही सोय करण्यात आली आहे. 3 एप्रिल रोजी दुपारी 15.50 वाजता पुण्याहून सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 06.30 वाजता नागपूरला पोहोचेल. परतीची गाडी 4 एप्रिल रोजी सकाळी 08.00 वाजता सुटून रात्री 23.30 वाजता पुण्यात दाखल होईल. या गाड्या दौंड, अहिल्यानगर, मनमाड, जळगाव, अकोला आणि वर्धा या स्थानकांवर थांबतील.

advertisement

मुंबई ते मडगाव या मार्गावर 01129 आणि 01130 या विशेष गाड्यांच्या एकूण 4 फेऱ्या होणार आहेत. 3 आणि 5 एप्रिल रोजी पहाटे 00.20 वाजता सुटणाऱ्या गाड्या दुपारी 15.15 वाजता मडगावला पोहोचतील. परतीच्या गाड्या दुपारी 16.00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 03.45 वाजता मुंबईत येतील. कोकण मार्गावरील रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबे असतील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे दर घसरलेलेचं, लिंबू खातंय चांगलाच भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

एकूणच मध्य रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार असून उन्हाळी हंगामात प्रवास अधिक सुलभ, आरामदायी आणि नियोजनबद्ध करण्यास मदत करणार आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
उन्हाळी सुट्ट्यांत प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वेवर 8 विशेष गाड्या धावणार, चेक करा वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल