नेमकं घडलं काय?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच दादर येथून रत्नागिरी- सावंतवाडीपर्यंत मेल-एक्स्प्रेस गाड्यांची संख्या आधीच कमी आहेत, अशातच काही असलेल्या गाड्यांचे थांबे मुंबईतील काही थांबे बदलले जात आहेत, अशाने प्रवाशांची अडचण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एवढंच नाही तर उत्तर भारतात ज्या गाड्या जातात त्यांना प्राधान्य दिले जात असल्याची भावना कोकणवासीयांमध्ये निर्माण झाली आहे.
advertisement
त्यात दादर-रत्नागिरी एक्स्प्रेसबाबतही असाच एक निर्णय घेण्यात आलेला आहे. मध्य रेल्वेने परिचालनातील अडचणींचे कारण देत ही गाडी आता दादरऐवजी दिवा स्थानकातून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दादरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त प्रवास करावा लागणार आहे.
दरम्यान रेल्वे मंत्रालयाने दादर ते गोरखपूर विशेष एक्स्प्रेस कायमस्वरूपी चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही गाडी गेल्या 2 वर्षांपासून विशेष गाडी म्हणून धावत होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा निर्णय जाहीर केला असून भाजप नेते रवी किशन यांनी यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती.
या सर्व घेतलेल्या निर्णयांमुळे कोकण प्रवाशांमध्ये नाराजी वाढलेली आहे. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया देत ही चूक तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी केली आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, उपनगरी लोकल गाड्यांमुळे दादर-रत्नागिरी गाडी चालवताना अडचणी येतात. कोकणाकडून येणारी गाडी दिवा स्थानकात येताना किंवा तिथून बाहेर पडताना मुख्य मार्गावर आणण्यासाठी काही वेळ उपनगरी गाड्या थांबवाव्या लागतात. त्यामुळे वेळापत्रकावर परिणाम होतो असे रेल्वेने सांगितले आहे.
