नेमकं काय म्हणाले फडणवीस?
'मराठा आरक्षणाला सर्वांधिक विरोध हा शरद पवार यांनी केला, शरद पवारांना आरक्षण कधी द्यायचं नव्हतं त्यांना समाजाला फक्त झुंजवत ठेवायच होतं. आपण मराठा समाजाला आरक्षण दिल आणि हायकोर्टात टिकून ही दाखवलं. मविआच्या काळात सुप्रीम कोर्टात त्यांना आरक्षण टिकवता आलं नाही', असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'आता आपण तीन राज्यांची निवडणूक जिंकल्याने आपलं मनोबल उचावलं आहे. मात्र विरोधीपक्षाचं मनोबल खचलं आहे. विरोधकांना आता देशाची नाही तर स्वत:ची चिंता आहे. येणारे दिवस अत्यंत सावधानतेने आपल्याला काढावे लागणार आहेत. तीन राज्यात मिळालेलेल्या विजयाचा उत्साह आहे. प्रत्येक निवडणूक ही गंभीरतेने घ्यायची आहे. देशातील सामान्य माणसाला खात्री आहे की देशात विकास आणि परिवर्तन मोदीच करू शकतात' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
