शिवसेनेनं बाळासाहेबांना धोका दिला : मोदी
मोदी म्हणाले, बाबासाहेब ठाकरे हे पंचत्वात विलीन झाले. या शिवतीर्थावरून बाळासाहेबांचा आवाज घुमत होता. आज त्यांच्या आत्म्याला वेदना पोहोचत असतील. नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना धोका दिला. शिवसैनिकांच्या बलिदानाला धोका दिला. राम मंदिराला शिव्या देणाऱ्यांसोबत गेले. सत्तेसाठी मुंबईवर हल्ल्यानंतर पार्टी करणाऱ्या लोकांसोबत गेले आहे. जो काँग्रेस सावरकरांना शिव्या देतो, त्यांच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले आहे.
advertisement
शरद पवारांना पंतप्रधान मोदींचे चॅलेंज
मी शरद पवारांना चॅलेंज देतोय, तुम्ही राहुल गांधींकडून हे बोलून दाखवा, सावरकरांचा कधीच अपमान करणार नाही. आता त्यांचं तोंड बंद केलं आहे. मी आयुष्यभरात सावरकर यांच्याबद्दल चुकीचं बोलणार नाही, असं राहुल गांधी यांच्याकडून बोलून दाखवा. पण ते असं बोलणार नाही.
महाराष्ट्राच्या मातीसोबत यांनी धोका दिला आहे. तेव्हा एक काळ होता शिवसेनेची ओळखी ही घुसखोरांना पिटाळून लावणारी होती. पण आज त्यांना बौद्ध, जैन, शिख यांना आश्रय देण्यासाठी विरोध करत असतात. या आघाडीने पूर्ण देशाला धोका दिला आहे. ज्या कसाबने मुंबईत गोळीबार केला. त्याला ही लोक क्लिन चिट देत आहे. ज्या पाकिस्तानला जगात कुणी मानत नाही. सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईकवर आघाडीचे लोक बोलत आहे. सैनिकांना ही लोक अपमान करत आहे.
वाचा - ..आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच आले एकत्र, काय होती प्रतिक्रिया? PHOTOS
इंडिया आघाडीवाले हे बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करत आहे. त्यांचा अपमान करत आहे. यांनीच संविधानाला विरोध केला होता. धर्माच्या आधारावर आरक्षण नको असं बाबासाहेब म्हणाले होते. गरिबांच्या आरक्षणावर यांचा डोळा आहे. मी संपूर्ण देश फिरून आलोय, यावेळी निवडणुकीचा निकाल हा जुने सगळे रेकॉर्ड मोडणार आहे. देश हा एक महासत्ता म्हणून समोर येणार आहे, असं आश्वासन मोदी यांनी दिले.