2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो अबे यांनी मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वेचा पाया घातला. एकूण 508 किलोमीटर लांबीचा हा मार्ग भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. जपानच्या जेआयसीएच्या सहकार्याने हा प्रकल्प उभारला जात असून, एकूण खर्च 1,08,000 कोटी रुपये आहे.
टाकाऊ मूर्तींपासून टिकाऊ कलाकृती, तृप्ती यांचा पर्यावरण पूरक उपक्रम, अश्या बनवतात वस्तू, Video
advertisement
बुलेट ट्रेन कधी धावणार?
टीबीएम मशीनने बोगद्याच्या शेवटच्या टोकाचा दगड फोडला, तसे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी टाळ्या वाजवून या यशाचे स्वागत केले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इंजिनिअर्सनी भारत माता की जयच्या घोषणा देत तिरंगा फडकवला. या प्रसंगी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली की, भारतातील पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 रोजी धावेल.
2 तास वाचणार
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानच्या प्रवासाचा वेळ 1 तास 58 मिनिटांपर्यंत कमी होईल. यामुळे दोन्ही शहरांमध्ये थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. याचा फायदा दोन्ही शहरांतील जलद वाहतूक आणि विकासासाठी होणार आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत बुलेट ट्रेनमुळे कार्बन उत्सर्जन 95 टक्क्यांनी कमी होईल. ज्यामुळे पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव पडेल.
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीसाठीही मोठे योगदान दिले जात आहे आणि संपूर्ण प्रकल्पाच्या पूर्णतेनंतर भारतातील परिवहन प्रणाली मोठा टप्पा गाठणार आहे.
