हे सरकारचं पाप आहे : मनोज जरांगे पाटील
सुनिल कावळे हे मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड येथील रहिवासी होते. सुनिल कावळे यांनी स्वतःचा शर्ट आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात ही घटना घडली. आत्महत्या केलेले सुनिल कावळे हे जालन्याहून एकटेच मुबंईत आले होते. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील, म्हणाले की हे सरकारचं पाप आहे, सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. आमचा माणूस गेला आहे, तो परत येणार नाही. सरकारला हे परवडणार नाही, आम्ही बलिदान वाया जाऊ देणार नाही. सरकारने तातडीने आरक्षण दिलं पाहिजे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
advertisement
वाचा - रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा, 'ती' नोटीस अखेर रद्द
मृत्यूपूर्वी चिठ्ठीत काय लिहिलंय?
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील अंबड तालुक्यातील या तरुणाने स्वतःचा शर्ट आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात ही घटना घडली. आत्महत्या केलेला तरुण जालन्याहून एकटाच मुबंईत आला होता. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्याने मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान मनोज जरांगे यांचा दोन दिवस पुणे दौरा आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत त्यांची सभा होणार आहे. राज्य सरकारला जरांगे यांनी दिलेली मुदत 24 ऑक्टोबरला संपत असताना हा त्यांचा दौरा सरकारच्या अडचणी वाढवणारा ठरणार आहे.