एसटीची नवी भाडेवाढ कधीपासून?
एसटीची ही नवीन दरवाढ 15 एप्रिलपासून लागून होणार असून आता सुट्टीत गावी प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. विशेषतहा आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना 90 ते 100 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त भार सहन करावा लागेल.
का करावी लागली भाडेवाढ?
दरवर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्टीमध्ये ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते. त्यात एसटीचे जाळे महाराष्ट्रातील लहान-लहान खेड्यापाड्यांपर्यंत पसरले आहे त्यामुळे हजारो प्रवासी खाजगी वाहनापेक्षा एसटीलाच पसंती देतात. एसटी महामंडळाच्या नियमानुसार गर्दीच्या दिवसात हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार आहे. त्याच नियमाचा वापर करुन महामंडळाने तात्पुरत्या कालावधीसाठी ही दरवाढ जाहीर केलेली आहे.
advertisement
नेमक्या कोणत्या गाड्या महागणार?
ही करण्यात येणारी दरवाढ विशेषतहा साधी बस म्हणजे लाल परी, मिडी बस, जलद देवा आणि रात्रसेवा देणार्या गाड्यांसाठी लागू असेल.महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता प्रौढ प्रवाशांसाठी बसेसच भाडे प्रति टप्पा हा 12 रुपये असेल आणि लहान मुलांसाठी हे भाडे 7 रुपये ठरवण्यात आले आहे.
प्रवासाचे अंदाजे नवे दर असे असतील
1) परळ ते कोल्हापूर - 640 रुपयांऐवजी आता 704
2)मुंबई ते कोल्हापूर- 750 रुपयांऐवजी 825
3)मुंबई ते लातूर- 900 रुपयांऐवजी 1000 रुपये
4)मुंबई ते रत्नागिरी- 600 रुपयांऐवडी 700 रुपये
