मुंबईला तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या 7 जलाशयांतून पाणीपुरवठा केला जातो. नुकतेच मुंबईतील तलावांबाबत एका नागरी संस्थेने आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये तानसा तलावात 98.53 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर मोडक सागर पूर्ण क्षमतेने भरले असून 100 टक्के पाणीपातळी आहे. तसेच मध्य वैतरणा 98.18 टक्के, अप्पर वैतरणा 95.33 टक्के, भातसा 93.69 टक्के भरले आहे. तर विहार आणि तुलसी जलाशयांत 100 टक्के पाणीसाठा आहे.
advertisement
Water Cut in Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 30 ऑगस्टला या भागात पाणीपुरवठा बंद राहणार
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जलाशयांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. 4 जुलै रोजी मध्य वैतरणा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. तर 25 जुलै रोजीच विहार आणि मोडक सागर ओसंडून वाहू लागले. 24 जुलैला दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तानसा तलाव ओव्हरफ्लो झाला. गेल्या 17 दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
मराठवाडा, विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस, मुंबई पुण्यात अशी राहणार परिस्थिती, VIDEO
दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 95.75 टक्के पाणीसाठा झाला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहिले आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटणार आहे.






