पुष्पा गुप्ता असे मृत महिलेचे नाव असून आरोपी राजू गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडच्या रामगड परिसरात राहणाऱ्या या दाम्पत्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. वादाला कंटाळून पुष्पा काही काळ आपल्या माहेरी उत्तर प्रदेशला गेली होती. तिचा भाऊ कमलेश कुमार, जो भारतीय सैन्यात जवान आहे, त्याने मध्यस्थी करण्यासाठी बहिणीला पुन्हा मुंबईत आणले होते.
advertisement
नेमकं काय घडलं?
१४ मार्च रोजी घरात पुन्हा वाद झाल्याने पुष्पाने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर ती नातेवाईकांकडे जाण्यासाठी मुलुंड स्थानकात उभी होती. यावेळी तिचा भाऊ काही सामान विसरल्यामुळे घरी गेला होता. त्यावेळी आरोपी राजूने त्याला घरात कोंडून ठेवले आणि मुलासह स्थानकात गाठले. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर राजूने पुष्पाला घरी परतण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने घटस्फोटाची मागणी करताच संतापलेल्या राजूने तिला थेट धावत्या लोकलसमोर ढकलले.
२० तासांत पोलिसांनी आवळल्या मुसक्या
घटनेनंतर आरोपी राजू दादरमार्गे विरार आणि तिथून सुरतला पळून गेला होता. मुंबई रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढला आणि सुरत गुन्हे शाखेच्या मदतीने त्याला अटक केली.
