काय म्हणाले शरद पवार?
पवार म्हणाले, की मला एक प्रश्न विचारायचा आहे की पंतप्रधानांनी एका ठिकाणी भाषण केले. घटनात्मक दुरूस्तीचा निर्णय एक मताने घेतला. या घटना दुरूस्तीत एसी एस्टी महिलांना जशी संधी आहे, तशी ती ओबीसी महिलांना सुद्धा दिली जावी. त्यात पंतप्रधानाचे हे वक्तव्य क्लेश दायक आहे. ते म्हणाले की इतक्या वर्षात कोणी हा विचार पण केला नाही. महिला आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. मी मुख्यमंत्री असताना हे झाले. 1993 ला 73 वी घटना दुरूस्ती झाली. त्याची अमलबजावणी सुरू झाली. के आर नारायण उपराष्ट्रपती असताना आम्ही संमेलन आयोजित केले होते. महिला धोरण आम्ही जाहीर केले होते. महिलांना आधी 30 टक्के मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33 टक्के आरक्षण दिले. हे आम्ही निर्णय घेतले होते. आणि पंतप्रधान म्हणतात की कुणी विचार ही केला नाही, असा पलटवार पवार यांनी केला.
advertisement
ते पुढे म्हणाले की मी संरक्षण मंत्री असताना महिलांसाठी 18 टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. तेव्हापासून परेडचे नेतृत्व महिला करतात. महिलांना एअरफोर्समध्ये घेण्याचा निर्णय संरक्षण मंत्री असताना घेतला होता. तेव्हा महिलांना कुणी सैन्यात घ्यायला तयार नव्हते. महिलांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये घेतले जावे यासाठी बैठक झाली. तेव्हा सगळ्यांनी नाही सांगितले. चौथ्या बैठकीत मी सांगितले मंत्री म्हणून माझा अधिकार आहे. मी निर्णय घेतो. नो मोर डिक्शसन. हे सगळे निर्णय काँग्रेस काळात झाले. दुर्दैवाने पंतप्रधानांना कुणी सांगितले नाही, असा टोलाही पवारांनी मोदी यांना लगावला आहे.
वाचा - अंबादास दानवेंच्या आधी या नेत्याला होती विधान परिषदेची ऑफर, खैरेंचा मोठा गौप्यस्फोट
कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांवर 40 टक्के एक्सपोर्ट ड्युटी लावल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. आज संध्याकाळी पुन्हा बैठक होणार आहे तेव्हा माझा आग्रह आहे की 40 टक्के एक्सपोर्ट ड्युटी मागे ध्यावी. मला 100 टक्के असे वाटते की जागतिक बाजारात भारताची प्रतिमा बदलत आहेत. मी अहमदाबादला गेलो होते ते खरे आहे. तिथे एका शेतकऱ्याने एक उद्योग सुरू केला आहे. त्यांच्या उद्घाटनासाठी मी गेले होतो. त्या व्यक्तीने चिकापासुन एक असे उत्पादन सुरू केले आहे की जे सकाळी दोन थेंब घेतले तर रोग प्रतिकारक शक्ती वाढले. असे उद्योग होत असेल तर मी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जाईन. माझा भारत सरकारला आधी पाठिंबा राहील. 100 टक्के खोटे आहे. तिथे जे मुख्यमंत्री आहेत, त्या सरकारला पाठिंबा द्या असे मी म्हटले होते. सरकारमध्ये जा म्हटले नव्हते.