उद्धव ठाकरे यांनी स्टेजवरून भाषण करत म्हटलं होतं की, बॅरीकेटपलिकडे सर्व भाड्याने आणलेली तट्टू होती. मी लढण्यासाठी मैदानात आलोय. आमचे पोस्टर फाडले पण निवडणुकीत यांची मस्ती फाडल्याशिवाय राहणार नाही. बुलडोझरने शाखा पाडली. पण, खरा काय बुलढोझर असतो तो मुंब्र्याच्या रस्त्यावर पाहिला असेल. तुम्ही मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. त्यामुळे याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
advertisement
दरम्यान, आता यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आज फुसके बार मुंब्य्रात येऊन गेले ते वाजले नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. आणि त्यांना यु टर्न घेऊन रिटर्न जावं लागलं. आम्ही शिस्तीने तिथे होते. अर्धी मुंबई ते येताना सोबत घेऊन आले. दिवाळीत असं विघ्न आणणं योग्य नाही. काही लोकांना पोटदुखी झालीय. शिवसेनेची शाखा आम्ही पुन्हा बांधतोय. त्याचं कामही सुरु आहे. जुन्या शाखेत काही व्यवसाय चालायचे. शाखा हे न्यायाचं मंदिर असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.