नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Navi Mumbai International Airport- NMIA) पहिले उन्हाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जे 29 मार्च ते 24 ऑक्टोबर या कालावधीत लागू केले जाणार आहे. या विमानतळावरील फेऱ्यांमध्ये आता 16 वरून 46 ठिकाणापर्यंत सेवा विस्तारल्या जात आहेत. म्हणजेच आठवड्याला 1092 वेळा विमान अवकाशात झेपावणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वेळापत्रकामुळे 30 नवीन देशांतर्गत मार्ग सुरू होणार आहेत. जे विमानतळाला भारतातील व्यावसायिक, पर्यटन आणि धार्मिक केंद्रांशी जोडले जाईल. दिल्लीहून दररोज सर्वाधिक नऊ फेऱ्या होतील, त्यानंतर गोव्यासाठी सात आणि बंगळूरुसाठी सहा फेऱ्या असतील. याव्यतिरिक्त, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, वाराणसी आणि इंदोर या पर्यटन स्थळी सुद्धा विमानाच्या फेऱ्या असतील.
advertisement
या कालावधीत विमानतळावरून इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांचे विमान उड्डाण करणार आहे. विमान सेवेमध्ये वाढ झाल्यानंतर दिवसाला 156 विमान उड्डाणे होणार असून 1092 उड्डाणे आठवड्याला होणार आहेत. मार्च 2026 पर्यंत विमानतळावरून दररोज 22 विमान उड्डाण करत होते. पण आता एप्रिल 2026 पासून यामघ्ये आणखीन 78 फेऱ्या वाढवल्या जात आहेत. याचा फायदा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. विस्तारामुळे टियर-1 आणि टियर-2 शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्याची आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाढत्या प्रवासी मागणीला आधार मिळण्याची अपेक्षा आहे.
आग्रा, छत्रपती संभाजीनगर, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, दीव- दमन, दुर्गापूर, गोवा (दाबोलीम), गोरखपूर, हिंडन, हिरासर (राजकोट), हुबळी, जबलपूर, जम्मू- काश्मीर, झारसुगुडा, कन्नूर, कोल्हापूर, मदुराई, कोलकाता, पटना, रायपूर, श्रीनगर. तिरुपती, त्रिवेंद्रम आणि विझाग या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान उड्डाणे घेणार आहे.
