मध्यस्थी पडली महागात
मिळालेल्या माहितीनुसार, 4 एप्रिलच्या रात्री सुनिता आरखेड यांचा पुतण्या करण हा आपल्या काकूला भेटण्यासाठी रमाबाई नगर भागात आला होता. दरम्यान तिथं विनोद बचुटे आणि निशांत शिंदे यांनी विनाकारण थांबवून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर आपला पुतण्याबाबत असं काही घडत असल्याने सुनीता आरखडे या काही नातेवाईकांना घेऊन तिथं पोहचल्या.
advertisement
त्यांनी भांडण मिटवून काढण्याचा शांततेत प्रयत्न करत असताना आरोपींनी हिंसक वळ घेतले नंतर राहुल शिंदे याने रागाच्या भरात चाकू काढून तिघांवर वार केले आणि त्यांना मारहाणही केली. पीडित सुनीता आरखडे यांनी 5 एप्रिलच्या सकाळी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सहा जणांवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 11:47 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : काकूला भेटायला गेला अन् अख्खं कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात; भयंकर घटना
