पुणे-मुंबई महामार्ग सुरू झाला, पण दिलासा नाही
पुणे-मुंबई महामार्गावरील तब्बल 33 तासांनंतर वाहतूक सुरू झाली असली तरी वाहनचालकांचा त्रास काही कमी झालेला नाही. ज्याच दोन दिवस महामार्ग बंद राहिला असून त्यात वाहतूक कोंडीही झाली होती.
कांदा ट्रक अपघातामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहतूक ठप्प
पुणे-बेंगळुरू महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्यातील किनी टोलनाका परिसरात मोठी कोंडी झाली आहे. पुण्याहून कांद्याने भरलेला ट्रक हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथील ओढ्यावरील पुलाजवळ पलटी झाला. आज सकाळी घडलेल्या या अपघातामुळे ट्रकमधील कांदा संपूर्ण रस्त्यावर विखुरला गेला.
advertisement
परिणामी पुण्याकडून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. किनी टोलनाक्यापासून कराडकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
पुन्हा एकदा एक कंटेनर बंद पडला
दरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवाशांची अडचण अद्याप संपलेली नाही. आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकरच्या भीषण अपघातामुळे तब्बल 28 तास महामार्गावर वाहतूक ठप्प होती. मात्र वाहतूक हळूहळू सुरळीत होत असतानाच घाटात सिमेंटने भरलेला एक अवजड कंटेनर बंद पडला. त्यामुळे पुन्हा एकदा वाहतुकीचा वेग मंदावला असून प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
