TRENDING:

Mumbai Local: मुंबईकरांचा कधी होणार गारेगार प्रवास? AC आणि साध्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ कधी? नवी माहिती समोर

Last Updated:

पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. साध्या लोकलसह एसी लोकलच्याही फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: नोकरदारांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही मुंबई आणि उपनगरामध्ये नोकरीसाठी प्रवास करतायत तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पश्चिम रेल्वेवर साध्या लोकलसह एसी लोकल सुद्धा धावणार आहे. या दोन्हीही पद्धतीच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये 19 फेब्रुवारीपासून वाढ केली जाणार आहे. एक एसी लोकल आणि तीन साध्या लोकलचा समावेश होणार आहे. दिवसातून किती लोकल फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे, जाणून घेऊया...
Western Railway Has Announced 12 AC And 3 Non AC Local Trains From 19th February 2026
Western Railway Has Announced 12 AC And 3 Non AC Local Trains From 19th February 2026
advertisement

19 फेब्रुवारीपासून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून पश्चिम रेल्वेवर उपनगरीय रेल्वे सेवेमध्ये एक एसी लोकल आणि तीन साध्या लोकल अशा चार नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. 11 सामान्य लोकल फेऱ्या रद्द करून त्या जागी एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. उन्हाचे वाढते तापमान लक्षात घेता रेल्वेकडून प्रवाशांच्या सेवेमध्ये एसी लोकल आणली गेली आहे. आत्ताच उन्हाची कलही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्या दृष्टीने रेल्वेने एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. 12 अतिरिक्त एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार असून 3 सामान्य लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

यापूर्वी पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या एकूण फेऱ्या 121 होत्या ज्या आता 133 एकूण फेऱ्या होणार आहेत. तर, पश्चिम रेल्वेवर एकूण 1410 लोकल फेऱ्या होत्या. ज्यांची संख्या 1414 पर्यंत पोहोचली आहे. खरंतर, शनिवार- रविवार अनेक नोकरदारांना सुट्टी असते. त्यामुळे त्या दिवशी अनेक एसी लोकल रद्द केल्या जातात. शनिवार आणि रविवारी चालणाऱ्या एसी सेवांची संख्या 77 वरून 106 पर्यंत लक्षणीयरीत्या वाढवली गेली आहे. ज्यामुळे विकेंडच्यावेळी घरातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना अधिक आरामदायक आणि सोयीस्कर प्रवास होईल. या व्यतिरिक्त, सध्या भाईंदर ते वांद्रे अशी धावणारी धीमी लोकल आता विरारहून धावेल, ज्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त सुविधा आणि सुधारित कनेक्टिव्हिटी मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईकरांचा कधी होणार गारेगार प्रवास? AC आणि साध्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ कधी? नवी माहिती समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल