केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)चे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमाला आपल्या पक्षात सामील करून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी तिची तुलना थेट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी केली. 'इटलीहून येऊन सोनिया गांधी भारतात राजकारण करू शकतात, पंतप्रधानपदाच्या दावेदार होऊ शकतात, तर पाकिस्तानची सीमा हैदर राजकारणात का येऊ शकत नाही?', असा सवालच त्यांनी उपस्थित केला.
advertisement
या शहरातील लोकांनी घराबाहेर जे लिहिलं ते पाहून बसेल धक्का, नेमका काय आहे प्रकार
पुढे ते म्हणाले, 'सीमा हैदर खरोखर निर्दोष असतील, त्या गुप्तहेर असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत आणि त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर प्रदेश महिला विंगच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली जाऊ शकते.' दरम्यान, किशोर मासूम यांच्या या वक्तव्यामुळे आधीच चर्चेत असलेलं सीमा प्रकरण आता आणखी चर्चेत आलं आहे.
पतीसोबत फिरायला गेलेली महिला क्रूझमधून समुद्रात पडली? मुलाची परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव
'सीमा हैदर एक उत्तम वक्त्या आहेत. त्यांनी राजकारणात नशीब आजमवायला हवं', असंही किशोर मासूम म्हणाले. विशेष म्हणजे किशोर मासूम हे दयानतपूरचे रहिवासी आहेत. हे गाव राबुपुरापासून जवळच आहे. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष मोदींच्या NDA आघाडीत असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे केंद्रात दुसऱ्यांदा मंत्रीपदी विराजमान आहेत.
