राज्यसभेत बोलताना अमित शाह काँग्रेसवर विविध मुद्यांवर हल्लाबोल केला. याच दरम्यान, शाह यांनी म्हटले की, आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन झाली आहे. सगळीकडे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर म्हणायचे. "त्यांनी देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते, तर स्वर्गात जागा मिळाली असती," असे शाह यांनी सांगितले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधकांनी या वक्तव्यावर शहा यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी म्हटले की, 'जे मनुस्मृतीवर विश्वास ठेवतात ते निश्चितपणे आंबेडकरांशी मतभेद असतील.
advertisement
तर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, अमित शाह यांनी राज्यसभेत बोलताना बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य हे तिरंगाच्या विरोधात होते. त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्रचा विरोध केला. संघ परिवाराच्या लोकांना भारतीय संविधानाऐवजी मनू स्मृती लागू करायची होती असा आरोपही खर्गे यांनी केला. माझ्यासारख्या करोडो लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकर हे देवापेक्षा कमी नाहीत. दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि गरिबांसाठी देवासारखे आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील शाहांवर टीका केली. संविधानाच्या शिल्पकाराबद्दल अशी घृणास्पद विचारसरणी भाजप आणि आरएसएसच्या शाळेतून वाढली असल्याची टीका त्यांनी केली.