सिनेमाच्या पडद्यावरून थेट रॅम्पवर!
कार्यक्रमाची पहिली थीम होती हातमाग ते सिल्व्हर स्क्रीन. १९४० च्या दशकातील ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातल्या अभिनेत्रींनी नेसलेली साडी असो वा आजच्या काळातील मॉडर्न ड्रेपिंग... प्रत्येक दशकातील आयकॉनिक साड्या जेव्हा मॉडेल नेसून आल्या, तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी यावेळी एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला, त्या म्हणाल्या, "हातमाग धाग्यांनी कथा विणतो, तर सिनेमा प्रकाशाच्या चौकटीत! साडी हे केवळ वस्त्र नाही, तर ती आपली सांस्कृतिक ओळख आहे जी पिढ्यानपिढ्या पडद्यावर दिमाखात झळकत आली आहे."
advertisement
अख्खा भारत एकाच धाग्यात!
दुसऱ्या भागात भारताच्या कानाकोपऱ्यातील विणकरांची कला पाहायला मिळाली. छत्तीसगडचे तुसार, वाराणसीचे बनारसी बुटीदार, मध्य प्रदेशची चंदेरी आणि केरळची कुथंपुल्ली... या प्रत्येक साडीमागे विणकराचे कष्ट आणि त्या प्रांताची संस्कृती होती. पर्यटन मंत्री कपिल मिश्रा यांनी आवर्जून सांगितलं की, या सोहळ्यामुळे दिल्ली आता केवळ पाहुणचार करणारी नाही, तर संस्कृतीचं रक्षण करणारी 'कल्चरल क्युरेटर' म्हणून जगासमोर येत आहे.
वंदे मातरम अन् डोळ्यांचं पारणं फिटणारा समारोप
कार्यक्रमाचा सर्वात हृदयस्पर्शी क्षण होता तो म्हणजे 'वंदे मातरम'ला दिलेली मानवंदना. 'वंदे मातरम' गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, 'शिखाज् कारीगरी'च्या साड्यांवर चक्क हाताने रंगवलेली पिचवाई, वरली, गोंड आणि मधुबनी कला पाहायला मिळाली. जेव्हा 'वंदे मातरम'च्या सुरावटी सुरू झाल्या आणि या कलाकृती रॅम्पवर आल्या, तेव्हा अख्खं प्रेक्षागृह भारावून गेलं होतं.
फॅशन दिग्दर्शक संदेश नवलखा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला हा शो केवळ 'फॅशन' नव्हता, तर तो एक 'अनुभव' होता. यातून केवळ कलेचे प्रदर्शन झाले नाही, तर लाखो विणकरांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल ठरलं आहे.
परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ डिझायनर शिखा अजमेरा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "साडी हे माझ्यासाठी केवळ वस्त्र नसून तो एक 'मुव्हिंग कॅनव्हास' आहे. जुन्या परंपरांना आधुनिक कथेची जोड देण्याचा आमचा हा प्रयत्न होता."
फॅशन दिग्दर्शक संदेश नवलाखा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला हा शो तांत्रिकदृष्ट्या आणि सादरीकरणाच्या बाबतीत प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला. या सोहळ्याने फॅशनला केवळ सौंदर्यापुरते मर्यादित न ठेवता, ती राष्ट्रीय अभिमान आणि संस्कृतीचे प्रभावी माध्यम असल्याचे सिद्ध केले.
