TRENDING:

बिहारमध्ये मोठी उलथापालथ, भाजपचा मुख्यमंत्री होणार? नीतीश कुमार राज्यसभेत जाणार?

Last Updated:

Nitish Kumar Rajya Sabha Election: नीतीश कुमार यांनी दिल्लीच्या राजकारणात जाण्यास सहमती दर्शवली तर बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाची खुर्ची भारतीय जनता पक्षाकडे जाईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरू असल्याची चर्चा पाटण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. नीतीश कुमार यांनी दिल्लीच्या राजकारणात रूची दाखवली आणि राज्यसभेवर जाण्यास तयार झाले तर महागठबंधनमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आपला मुख्यमंत्री बसवू शकतो. त्यामुळे पुढच्या काळात बिहारमध्ये मोठा उलटफेर होऊ शकतो, असे राजकीय जाणकार सांगतात.
नीतीश कुमार
नीतीश कुमार
advertisement

नीतीश कुमार यांनी राज्यसभेवर जावे, असे जदयू आणि भारतीय जनता पक्षातील एका गटाला वाटते. राज्यसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना नीतीश कुमार यांनी दिल्लीत जावे, यासाठी पडद्याआडून राजकीय व्यूहरचना आखली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आजतकने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार उपमुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक

जदयूच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आज नीतीश कुमार यांची पाटण्यात भेट घेतली.  नीतीश कुमार गुरूवारी आपला नामांकन अर्ज दाखल करतील, असे कळते.  नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे उपमुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचेही कळते.

advertisement

भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणार

जर नीतीश कुमार राज्यसभेत गेले तर बिहारची सूत्रे कुणाकडे जाणार हा मोठा प्रश्न आहे. सूत्रांच्या म्हणण्यांनुसार नीतीश यांनी दिल्लीत जाण्याला सहमती दर्शवली आणि केंद्रात मोठे पद घेतले तर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रि‍पदावर आपला दावा सांगेल. महागठबंधनमध्ये संख्याबळाच्या हिशेबाने भारतीय जनता पक्ष सध्या सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे स्वाभाविक मुख्यमंत्रि‍पदावर ते दावा सांगू शकतात.

advertisement

नीतीश कुमार यांची राजकीय कारकीर्द

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
VIDEO: 25 लाखांचा विडा अन् 10 लाखांचा लिंबू, मोशी उत्सवात दीड कोटींची बोली, अशी
सर्व पहा

नीतीश कुमार यांनी जवळपास नऊ वेळा बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवले. २०१४-२०१५ वगळता २००५ सालापासून नीतीश कुमार यांनी बिहारचे नेतृत्व केले आहे. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून त्यांचे नेतृत्व घडले. १९८५ साली त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये रेल्वे, कृषी अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. कधी भाजप तर कधी लालूंच्या सोबतीने त्यांनी सरकार चालवले. सतत भूमिका बदलल्याने त्यांच्या नावामागे पलटूराम असे टीकात्मक विशेषण लागले.

advertisement

मराठी बातम्या/देश/
बिहारमध्ये मोठी उलथापालथ, भाजपचा मुख्यमंत्री होणार? नीतीश कुमार राज्यसभेत जाणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल