समुद्रात 'क्रॅश-लँडिंग'चा थरार
सकाळी ९:३० च्या सुमारास पवन हंसचे हे हेलिकॉप्टर पोर्ट ब्लेअरहून मायाबंदरच्या दिशेने झेपावले होते. टेकऑफनंतर काही वेळातच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. जमिनीवर किंवा धावपट्टीवर परतणे अशक्य असल्याचे पाहून, वैमानिकाने अतिशय शिताफीने हेलिकॉप्टर अंदमान समुद्राच्या लाटांवर उतरवण्याचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे हेलिकॉप्टरमधील दोन क्रू सदस्यांसह सातही प्रवाशांचे प्राण वाचलं.
advertisement
काही मिनिटांत बचावकार्य पूर्ण
हेलिकॉप्टर समुद्रात कोसळल्याची माहिती मिळताच नौदल आणि स्थानिक बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. समुद्राच्या पाण्यात अडकलेल्या सातही जणांना बाहेर काढण्यात आले. सुदैवाने, या भीषण अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. प्रवाशांना किरकोळ ओरखडे आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पवन हंसच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पवन हंस दुर्गम भागाची जीवनवाहिनी
१९८५ मध्ये स्थापन झालेली पवन हंस ही केंद्र सरकारची सर्वात मोठी हेलिकॉप्टर सेवा पुरवणारी कंपनी आहे. डोंगराळ आणि दुर्गम भागातील प्रवासासाठी या कंपनीची सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अंदमान-निकोबार सारख्या बेटांच्या समूहावर वाहतुकीसाठी या सेवेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. अनेक दिग्गज राजकारणी आणि पर्यटकही या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सेवेवर अवलंबून असतात.
