आता इतर देश जसे की, ब्राझील किंवा अमेरिका देखील भविष्यात जी-20 शिखर संमेलनाचे आयोजन करतील. त्यांच्यासाठी ही पद्धत अवलंबणे खूप कठीण ठरु शकते. भारताने एका अनोख्या पद्धतीने जी-20 ची अध्यक्षता पुढे वाढवली आहे. ज्यामध्ये सदस्य देशांच्या प्रतिनिधींना उत्कृष्ट चव आणि विलासी अनुभवांची संपूर्ण सीरीज ऑफर केली गेली आहे, जे भारताचे खरे स्वरूप आहे. बुधवारी एका दुर्गम गावातील एका लहान मुलीने मनगटावर 'G20 राखी' बांधली तेव्हा पंतप्रधान मोदींना हे स्पष्ट झाले. तिने ही राखी स्वतः बनवली होती आणि तिला समजले होते की G-20 हा कोणत्याही मोठ्या व्यक्तींसाठी नसून हा सर्वांचा कार्यक्रम आहे.
advertisement
विकसनशील देशांचा आवाज बुलंद करु शकतात ट्रॉयकाचे सदस्य, पंतप्रधान मोदींना विश्वास!
अगदी कट्टर टीकाकारही पंतप्रधान मोदींच्या अनुभवाने प्रभावित
अर्धशतकापूर्वी सार्वजनिक जीवनात आपली कारकीर्द सुरू करणारे पंतप्रधान मोदी म्हणतात की, वेळ आणि अनुभव हे त्यांचे सर्वात मोठे शिक्षक आहेत. 1972 मध्ये ते जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थेचे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक (पूर्णवेळ कार्यकर्ता) बनले. भ्रमणशील नरेंद्र मोदी यांनी देशातील 90 टक्के जिल्ह्यांमध्ये किमान एक रात्र काढली आहे आणि जीवनातील सर्व गोष्टी पाहिल्या आहेत आणि आत्मसात केल्या आहेत. पंतप्रधान मोदींचे कट्टर टीकाकारही अनिच्छेने कबूल करतात अनुभवाच्या बाबतीत पंतप्रधान मोदींसारखे कोणी नाही.
देशातील विविधता समोर आणण्यासाठी मोठ्या संधींचा उपयोग
पीएम मोदींनी मुलाखतीत सांगितले की, 'मी वास्तवाप्रती एक अतिशय जिवंत व्यक्ती आहे. एक अशी व्यक्ती जी जीवनात अनेक अनुभवांमधून गेलेली आहे. म्हणून, माझे निर्णय इतर स्त्रोतांकडील डेटा व्यतिरिक्त अधिकृत माहितीवर आधारित आहेत. माझ्या निर्णयाचा एक मोठा भाग 'ताज्या माहिती'वर आधारित आहे. त्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी करणे कितपत व्यवहार्य आहे यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांचा आणि सरकारमधील अधिकाऱ्यांचा सल्ला घेतो.' पंतप्रधान मोदींनी भारतातील विविध आकर्षणे दाखवण्यासाठी मेगा इव्हेंट्सचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा त्यांनी असं केलं आहे.
भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला, सरकारवर लोकांचा विश्वास : पंतप्रधान मोदी
देशाच्या प्रत्येक भागात आयोजित केले त्यांचे कार्यक्रम
पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, वाराणसीमध्ये जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे आणि बेंगळुरूमध्ये जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांचे स्वागत केले होते. गेल्या अनेक वर्षात त्यांनी विज्ञान भवनाचा वापर काही मोजके कार्यक्रम वगळता मोठ्या जागतिक कार्यक्रमांसाठी केलेला नाही. जे पूर्वीच्या सरकारांच्या काळात अनेक राज्यांच्या दौऱ्यांचे मुख्य केंद्र असायचे. म्हणूनच पंतप्रधान मोदी म्हणतात, 'ज्या लोकांना फक्त दिल्ली हाच हिंदुस्थान वाटतो, त्यांची मला अडचण आहे.' त्यांनी आपले कार्यक्रम भारताच्या प्रत्येक भागात नेले आहेत, म्हणून त्यांनी देशाच्या प्रत्येक भागाला जगाच्या कोपऱ्यांमध्ये नेतेल आहे.
जागतिक नेत्यांना पारंपारिक भेटवस्तू
पंतप्रधान मोदींनी जागतिक नेत्यांना भारताच्या विविध भागात बनवलेल्या आलिशान वस्तू भेट दिल्या आहेत. उदाहरणार्थ, हिमाचल प्रदेशचे कांगडा लघु पेंटिंग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना भेट म्हणून देण्यात आले होते. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 'माता नी पछेडी' देण्यात आले. जो गुजरातच्या भटक्या लोकांनी हातांनी बनवलेला कापडाचा तुकडा असतो. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जगातील नेत्यांना मी काहीही भेट देऊ शकलो असतो आणि त्यांना आनंद झाला असता. पण मी माझा एक-जिल्हा-एक-उत्पादन उपक्रम अनेक जागतिक नेत्यांकडे नेला. ज्यामुळे जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या कामगिरीचा खूप अभिमान वाटला.
