या केमिकल फॅक्ट्रीमध्ये साधारणपणे 25 कामगार आग लागली त्यावेळी काम करत होते. या केमिकल फॅक्ट्रीतच फटाक्यांचंही काम सुरू होतं. त्यांच्यामुळेच आगीचा जास्त भडका उडाला. पोलीस जेव्हा पेट्रोलिंग करत होते तेव्हा त्यांना ही आग दिसली. त्यानंतर या आगीची माहिती अग्निशमन दलाला कळवण्यात आली. आगीनं रौद्र रुप धारण केलं आणि संपूर्ण फॅक्ट्री जळून खाक झाली.
advertisement
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास दीड तासहून अधिक अवधी लागला. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन करण्यात आलं. ही आग साधारण ९.३० च्या आसपास लागल्याचं सांगितलं जात आहे. राजेंद्र नावाच्या व्यक्तीची ही फॅक्ट्री आहे. मृतदेह अत्यंत वाईट पद्धतीनं जळालेल्या अवस्थेत होते. फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
अग्निशमन दलाला फॅक्ट्रीमधून काही फटाके आणि त्याचे कागद सापडले आहेत. त्यावरुन ही आग किती भयंकर लागली असेल याचा अंदाज येऊ शकता. राजस्थानच्या भिवाडी आणि करौली परिसरात ही आग लागली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एक मजुराला रेस्क्यू केलं जात आहे. तर मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
