TRENDING:

मर्डर केसमध्ये 22 वर्षांपासून जन्मठेप, वकिलाने केला असा युक्तीवाद, CJI गवईंनी लगेच केली कैद्याची सुटका!

Last Updated:

मंगळवारी सुप्रीम कोर्टाने एका खून प्रकरणात जवळपास 22 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या जन्मठेपेच्या कैद्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : मंगळवारी सुप्रीम कोर्टाने एका खून प्रकरणात जवळपास 22 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या जन्मठेपेच्या कैद्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. भारताचे सरन्यायाधीश बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती के.विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या कैद्याने सुप्रीम कोर्टात या निर्णयाविरुद्ध धाव घेतली होती.
मर्डर केसमध्ये 22 वर्षांपासून जन्मठेप, वकिलाने केला असा युक्तीवाद, CJI गवईंनी लगेच केली कैद्याची सुटका!
मर्डर केसमध्ये 22 वर्षांपासून जन्मठेप, वकिलाने केला असा युक्तीवाद, CJI गवईंनी लगेच केली कैद्याची सुटका!
advertisement

दोन दशकांच्या तुरुंगवासानंतर याचिकाकर्ता मुदतपूर्व सुटकेची विनंती करत असल्याचे खंडपीठाने नमूद केले. याचिकाकर्त्याने त्याची जन्मठेपेची शिक्षा माफ करण्यासाठी राज्याकडे अर्ज केला होता, ज्यावर सरकारने सुरुवातीला त्याला दोषी ठरवणाऱ्या न्यायालयाकडून अहवाल मिळवला होता. त्यात नमूद केले आहे की, अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या मताच्या आधारे, सरकारने 24 वर्षांनंतर त्याची सुटका करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले की त्याला 22 वर्षांनंतर सोडण्यात आले पाहिजे होते. खंडपीठाने 2010 मध्ये सरकारने सूट विचारात घेण्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेतला.

advertisement

याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की त्याचा खटला कलम 3(ब) अंतर्गत येईल, जो एखाद्या व्यक्तीने किंवा टोळीने कुटुंबाचा सन्मान राखण्यासाठी पूर्वनियोजित पद्धतीने केलेल्या हत्येचा संदर्भ देतो. खंडपीठाने नमूद केले की याचिकाकर्त्याने दुसऱ्या आरोपीसह एका पुरूषावर आणि त्याच्या मित्रावर हल्ला केला, ज्यामुळे त्या पुरूषाचा मृत्यू झाला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, नवीन सोयाबीनचे दर घसरलेलेच, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

खंडपीठाने म्हटले की, "हा हल्ला पूर्वनियोजित होता. सरकारी वकिलांनी सांगितलेल्या हेतूनुसार, तो पुरूष याचिकाकर्त्याच्या बहिणीवर प्रेम करत होता, जिचे आयुष्य या प्रेमप्रकरणामुळे उद्ध्वस्त होत होते." खंडपीठाने पुढे म्हटले की, "म्हणून, हे स्पष्ट आहे की हा गुन्हा कुटुंबाचा सन्मान जपण्यासाठी करण्यात आला होता, ज्याचा अर्थ सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाचे नाव कलंकित होऊ शकते. जरी ते माफ करण्यायोग्य नसले तरी, जवळजवळ 22 वर्षांच्या तुरुंगवासानंतर याचिकार्त्याकडे माफीसाठी वैध खटला आहे." खंडपीठाने असेही म्हटले की याचिताकर्त्याला त्याची 22 वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी फक्त तीन महिने शिल्लक आहेत आणि म्हणूनच त्याला सोडण्याचा आदेश देण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
मर्डर केसमध्ये 22 वर्षांपासून जन्मठेप, वकिलाने केला असा युक्तीवाद, CJI गवईंनी लगेच केली कैद्याची सुटका!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल