शिवाजी महाराजांचे धैर्य आजही प्रेरणा देते, त्यांचे सुशासन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरते, आणि त्यांची न्याय आणि स्वाभिमानाची भावना आजही समाजाला बळकटी देते,असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाला इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाचे मानले आणि त्यांच्या संरक्षणासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले; यावर पंतप्रधानांनी भर दिला. या वचनबद्धतेमुळेच त्यांचे जीवन भारताच्या पिढ्यानपिढ्यासाठी एक पथदर्शी दीपस्तंभ राहिले आहे.
advertisement
आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, आपण दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, धोरणी नीतीज्ञ आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते यांना आदरांजली वाहत आहोत.
त्यांचे शौर्य आपल्याला प्रेरणा देवो, त्यांचे सुशासन आपल्यासाठी मार्गदर्शन करो आणि न्याय व स्वाभिमानाची त्यांची भावना आपल्या समाजाला अधिक सक्षम करो.
