TRENDING:

Heat Wave : उष्माघाताने वानराचा बळी! अंतिम संस्कारासाठी जमलं अख्ख गाव; PHOTOS

Last Updated:
Heat Wave : शेवगाव तालुक्यात उष्माघाताने एका वानराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ह्या वानरावर गावकऱ्यांनी मनुष्याप्रमाणे अंतिम संस्कार केले. (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी)
advertisement
1/5
उष्माघाताने वानराचा बळी! अंतिम संस्कारासाठी जमलं अख्ख गाव; PHOTOS
राज्यातील अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. यामध्ये वन्यप्राण्यांसह लोकांचेही बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथे उष्माघाताने एक वानराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ह्या उष्माघाताने मरण पावलेल्या वानरावर गावकऱ्यांनी मनुष्या प्रमाणे अंतिम संस्कार केले.
advertisement
2/5
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जोहरापूर गावामध्ये एक वानराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. उष्मघातामुळे वानर गेल्या दोन-तीन दिवसांपासून आजारी होते. वानरावर जोहरापूर येथे उपचार ही केले गेले, परंतु वानराच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर त्याचा मृत्यू झाला.
advertisement
3/5
कडक उन्हाळा असल्यामुळे वन्य प्राणी हे मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहे. जंगलामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना उष्णतेला सामोरे जावे लागते. सुस्तावलेला वनविभाग कधी जागा होणार हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकाला पडला आहे?
advertisement
4/5
वानराच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन या वानराचा अंत्यविधीचा कार्यक्रम घेण्याचे ठरवले. त्यानंतर स्वाध्याय हरिनामाच्या गजरात या वानराचा अंत्यविधी जोहरापूर गावातील हनुमान मंदिराच्या समोर करण्यात आला.
advertisement
5/5
यावेळी गावातील लहान, थोर, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने यावेळी हजर होते. महिलांना आपले दुःख यावेळी अनावर झाले होते. बबन देवा, व राजू देवा यांनी मंत्र उपचारात वानरसा अंत्यविधी केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Heat Wave : उष्माघाताने वानराचा बळी! अंतिम संस्कारासाठी जमलं अख्ख गाव; PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल