TRENDING:

Vidarbha Weather: विदर्भात उष्णतेचा कहर सुरूच, नागपूरसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, आज होरपळणार!

Last Updated:
Vidarbha Weather: एप्रिल महिन्यात विदर्भात उष्मतेची लाट असून तापमानाचा पारा 45 अंशांच्या पार गेला आहे. आज काही जिल्ह्यांन उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
1/7
विदर्भात उष्णतेचा कहर सुरूच, नागपूरसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, आज होरपळणार!
विदर्भात उष्णतेची लाट आणखी दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, अकोला या जिल्ह्यांतील तापमान 45 अंश सेल्सिअस वर अजूनही कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
2/7
विदर्भात उष्णतेची लाट आणखी दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, अकोला या जिल्ह्यांतील तापमान 45 अंश सेल्सिअस वर अजूनही कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
3/7
आज 24 एप्रिल रोजी नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांतील कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 23 ते 28 अंश सेल्सिअस पर्यंत राहील. या सर्व ठिकाणी हीट वेव्हचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
4/7
गेले तीन दिवसांपासून असणारी उष्णतेची लाट पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
5/7
गोंदिया, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांतील कमाल तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस इतके असून किमान तापमान 23 ते 27 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांत मुख्यतः आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांना तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
यंदा विदर्भात एप्रिलमध्येच उच्चांकी तापमान गेले आहे. जगातील सर्वाधिक तापमानाची 4 शहरे विदर्भातील असून आता पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उन्ह होरपळून काढत असल्याचे चित्र आहे.
advertisement
7/7
गेले तीन दिवस सतत उष्णतेची लाट असल्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढत असल्याने आरोग्याची काळजी घेण्यासोबतच काही पथ्ये सुद्धा पाळणे गरजेचे आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे. तसेच भरपूर पाणी प्यावे. काही त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Vidarbha Weather: विदर्भात उष्णतेचा कहर सुरूच, नागपूरसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, आज होरपळणार!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल