Weather Alert: गणेश चतुर्थीला महाराष्ट्रात पाऊस जोरदार बरसणार, 25 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
27 ऑगस्ट रोजी राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
1/7

27 ऑगस्ट रोजी राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात 27 ऑगस्ट रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सहा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नाही. स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे.
advertisement
7/7
27 ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाचे जोरदार आगमन होणार असून अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. काही भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आल्याने सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: गणेश चतुर्थीला महाराष्ट्रात पाऊस जोरदार बरसणार, 25 जिल्ह्यांना अलर्ट