भगवान विष्णूंना प्रिय, पण बद्रीनाथ मंदिरात शंख वाजवण्यास सक्त मनाई, काय आहे नेमकं कारण?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
उत्तराखंडमधील चार धामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ धाम मंदिरात भगवान विष्णूची पूजा केली जाते. हिंदू धर्मात शंख फुंकणे अत्यंत शुभ मानले जाते आणि शंखाचा ध्वनी देवांना प्रिय असतो, असे म्हटले जाते. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे बद्रीनाथ मंदिरात शंख वाजवण्यास सक्त मनाई आहे.
advertisement
1/7

उत्तराखंडमधील चार धामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ धाम मंदिरात भगवान विष्णूची पूजा केली जाते. हिंदू धर्मात शंख फुंकणे अत्यंत शुभ मानले जाते आणि शंखाचा ध्वनी देवांना प्रिय असतो, असे म्हटले जाते. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे बद्रीनाथ मंदिरात शंख वाजवण्यास सक्त मनाई आहे.
advertisement
2/7
शंख हा भगवान विष्णूंच्या आवडत्या वस्तूंपैकी एक आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की बद्रीनाथ धाममध्ये शंख वाजवला जात नाही. येथे पूजेदरम्यान शंख वाजवला जात नाही. काही लोक यामागील गूढतेबद्दल बोलतात तर काही लोक त्यामागील वैज्ञानिक कारणे सांगतात. इथे शंख का वाजवला जात नाही हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
3/7
बद्रीनाथ धामच्या आजूबाजूचा परिसर हा अलकनंदा नदीच्या काठावर वसलेला आहे. हा परिसर भगवान नारायणाच्या तपश्चर्येचे ठिकाण मानले जाते. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, बद्रीनाथ धामजवळ साप राहतात असे मानले जाते.
advertisement
4/7
शंखाचा आवाज सापांसाठी वेदनादायक मानला जातो. असे मानले जाते की शंख वाजवल्याने सापांना राग येऊ शकतो ज्यामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा त्या परिसरात अडथळे येऊ शकतात. या कारणास्तव येथे शंख वाजवण्यास मनाई आहे.
advertisement
5/7
बद्रीनाथ मंदिर हे हिमालयाच्या अत्यंत उंचावर आणि बर्फाच्छादित डोंगररांगांमध्ये स्थित आहे. वैज्ञानिकांच्या मते, शंख वाजवल्याने निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरींची वारंवारता खूप जास्त असते. जर हा नाद तिथे केला, तर डोंगरांवरील बर्फामध्ये कंपनं निर्माण होऊन 'हिमस्खलन' होण्याचा किंवा बर्फात भेगा पडण्याचा मोठा धोका असतो.
advertisement
6/7
बद्रीनाथमध्ये शंख न वाजवण्याची एक कथा शास्त्रांमध्ये आढळते. एकदा देवी लक्ष्मीजी बद्रीनाथच्या तुलसी भवनात ध्यान करत होत्या. त्यावेळी भगवान विष्णूने शंखचूर्ण नावाच्या राक्षसाचा वध केला. हिंदू धर्मात विजय झाल्यावर शंख वाजवला जातो परंतु विष्णूजींना लक्ष्मीजींच्या ध्यानात अडथळा आणायचा नव्हता म्हणून त्यांनी शंख वाजवला नाही.
advertisement
7/7
ही परंपरा अनेक शतकांपासून चालत आली आहे. मंदिरातील पुजारी आणि स्थानिक लोक या नियमाचे काटेकोरपणे पालन करतात. वैज्ञानिक दृष्टीकोन असो वा धार्मिक श्रद्धा, बद्रीनाथ धामच्या शांततेतच या स्थानाचे पावित्र्य जपले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
भगवान विष्णूंना प्रिय, पण बद्रीनाथ मंदिरात शंख वाजवण्यास सक्त मनाई, काय आहे नेमकं कारण?