TRENDING:

IND vs NZ : फक्त 3 बॉलमध्ये फिरली मॅच, बॅटिंगला यायच्या आधीच टीम इंडियाचा विजय कसा झाला?

Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेटनी दणदणीत विजय झाला आहे. न्यूझीलंडने दिलेलं 154 रनचं आव्हान टीम इंडियाने फक्त 10 ओव्हरमध्ये पार केलं आहे.
advertisement
1/5
फक्त 3 बॉलमध्ये फिरली मॅच, बॅटिंगला यायच्या आधीच टीम इंडियाचा विजय कसा झाला?
अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना अगदी सहज जिंकला. अभिषेकने 20 बॉलमध्ये नाबाद 68 आणि सूर्यकुमार यादवने 26 बॉलमध्ये नाबाद 57 रनची खेळी केली. याचसोबत भारताने सीरिजमध्ये 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
advertisement
2/5
टीम इंडियाने 10 ओव्हरमध्ये हा सामना जिंकला असला तरी भारताचा विजय बॅटिंग सुरू व्हायच्या आधीच 3 बॉलमुळे निश्चित झाला होता. या सामन्यात टीम इंडियाने 2 बदल केले होते.
advertisement
3/5
वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंगऐवजी रवी बिष्णोई आणि जसप्रीत बुमराहला संधी मिळाली. दुसऱ्या टी-20 सामन्यात बुमराहला विश्रांती देण्यात आली होती, तर बिष्णोई सीरिजमध्ये पहिल्यांदाच खेळला.
advertisement
4/5
जसप्रीत बुमराहने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये फक्त 17 रन देऊन 3 विकेट घेतल्या. या कामगिरीबद्दल बुमराहला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यात बुमराहला सुरूवातीला बॉलिंगच दिली नाही.
advertisement
5/5
डेथ ओव्हरसाठी सूर्याने बुमराहला रोखून ठेवलं होतं. कॅप्टनचा हा निर्णय बुमराहने योग्य ठरवला आणि फक्त 3 विकेटच घेतल्या नाहीत, तर रनही कमी दिल्या. बुमराहने टीम सायफर्ट, मिचेल सॅन्टनर आणि काईल जेमिसनची विकेट घेतली. बुमराहच्या या स्पेलमुळे टीम इंडियाचा विजय निश्चित झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : फक्त 3 बॉलमध्ये फिरली मॅच, बॅटिंगला यायच्या आधीच टीम इंडियाचा विजय कसा झाला?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल