Team India : टॉस जिंकून सगळे बॉलिंग घेतात, पण बॅटिंग का घेतली? सूर्याने सांगितलं शॉकिंग निर्णयाचं कारण!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या पाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
advertisement
1/8

सूर्यकुमार यादवच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. टॉसला अवघी काही मिनिटं शिल्लक असताना भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनीही सूर्याला सल्ला दिला होता. टी-20 वर्ल्ड कपआधीचा हा शेवटचा सामना आहे, त्यामुळे कोणतेही प्रयोग करायची गरज नाही, असं गावसकर म्हणाले.
advertisement
2/8
गावसकरांनी हा इशारा दिल्यानंतरही सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा धोकादायक निर्णय घेतला. टॉसवेळी सूर्यकुमार यादवने पहिले बॅटिंगचं कारणही सांगितलं.
advertisement
3/8
रात्रीच्या वेळी दव पडल्यामुळे बॉलरना दुसऱ्या इनिंगमध्ये ओला बॉल पकडंही कठीण होतं. तसंच ओला बॉल खेळपट्टीवरून जलद गतीने बॅटवर येतो, त्यामुळे बॅटरना बॅटिंग करणंही सोपं होतं, असं असतानाही सूर्यकुमार यादवने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.
advertisement
4/8
आम्ही काल रात्रीही इथे आलो होतो, तेव्हा खूप दव पडलं होतं, त्यामुळे आम्ही आमच्या बॉलरची परीक्षा घ्यायचं ठरवलं आहे. बॉलरना या दवामध्ये रन रोखता येतात का? हे आम्हाला पाहायचं आहे, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
advertisement
5/8
टी-20 वर्ल्ड कपच्या आधी टीम इंडियाचा हा शेवटचा सामना आहे. वर्ल्ड कपमध्ये जर दव पडलेलं असताना दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग करावी लागली, तर बॉलर तयार असावेत, यासाठी सूर्यकुमार यादव आणि टीम मॅनेजमेंटने हा निर्णय घेतला.
advertisement
6/8
दरम्यान कर्णधार झाल्यापासून सूर्यकुमार यादवने फक्त चौथ्यांदा टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. यातल्या 3 वेळा तर सीरिजचे निकाल आधीच लागले होते. टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेतलेल्या मागच्या तिन्ही सामन्यात टीम इंडियाचा 133 रन, 135 रन आणि 21 रननी विजय झाला आहे.
advertisement
7/8
या सीरिजमध्ये टीम इंडियाने आधीच 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. पाचव्या सामन्यात टीम इंडियात 3 बदल करण्यात आले. इशान किशन, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांचं कमबॅक झालं आहे. तर हर्षित राणा, कुलदीप यादव आणि रवी बिष्णोई यांना बाहेर बसावं लागलं आहे.
advertisement
8/8
भारताची प्लेइंग इलेव्हन : भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : टॉस जिंकून सगळे बॉलिंग घेतात, पण बॅटिंग का घेतली? सूर्याने सांगितलं शॉकिंग निर्णयाचं कारण!