Vijay Hazare : शतक ठोकूनही विराट-रोहितला धक्का, टॉप 5 मधून झाले बाहेर, मग पहिल्या दुसऱ्या स्थानी कोण?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी अनेक वर्षानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पुनरागमन केलं होते.
advertisement
1/7

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी अनेक वर्षानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पुनरागमन केलं होते.
advertisement
2/7
या स्पर्धेत दोन्ही खेळाडू फक्त दोन सामने खेळणार होते. हे सामने खेळताना दोन्ही खेळाडूंनी शतकीय खेळी केली होती.
advertisement
3/7
विराट कोहलीने आंध्रप्रदेश विरूद्ध सामन्यात 101 बॉलमध्ये 131 धावांची खेळी केली होती.विशेष म्हणजे हे शतक ठोकल्यानंतर विराट कोहलीने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 16,000 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर गुजरात विरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 61 बॉलमध्ये 77 धावा केल्या होत्या.
advertisement
4/7
रोहित शर्माने सिक्कीम विरूद्ध पहिल्या सामन्यात 155 धावांची दीड शतकीय खेळी केली होती. तर दुसऱ्या सामन्यात तो गोल्डन डकवर आऊट झाला होता.
advertisement
5/7
या दोन्ही खेळाडूंची कामगिरी पाहता, सगळीकडे या दोघांचीच हवा आहे. पण विजय हजारे ट्रॉफीतील 2 सामने पार पडल्यानंतर फलंदाजांची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी पाहता रोहित आणि विराटला धक्का बसला आहे.
advertisement
6/7
कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली टॉप 5 मध्ये देखील नाहीयेत. पहिल्या स्थानी 271 धावांसह देवदत्त पडिक्कल आहे, दुसऱ्या स्थानी विदर्भाचा ध्रुव शौरी 245 धावांसह आहे.
advertisement
7/7
विराट कोहली या क्रमवारीत सहाव्या स्थानी आहे.त्याने दोन सामन्यात 208 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्मा टॉप 10 मध्ये नाही आहे. कारण त्याने दोन सामन्यात 155 धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vijay Hazare : शतक ठोकूनही विराट-रोहितला धक्का, टॉप 5 मधून झाले बाहेर, मग पहिल्या दुसऱ्या स्थानी कोण?