IND vs SA : आफ्रिकेने सूर्याच्या 'त्या' कॅचचा बदला घेतला, अहमदाबादने भारताला पुन्हा रडवले; 5 चक्रव्यूहने केला टीम इंडियाचा पराभव
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 111 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 76 धावांनी हारला आहे.
advertisement
1/9

सुपर 8 च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. साऊथ आफ्रिकेने टीम इंडियाचा 76 धावांनी पराभव केला आहे.
advertisement
2/9
साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 111 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 76 धावांनी हारला आहे.
advertisement
3/9
दरम्यान या सामन्यात टीम इंडियात सपशेल फेल ठरली आहे. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो सगळ्याच विभागात टीम इंडिया अपयशी ठरली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या पराभवाची कारणे जाणून घेऊयात.
advertisement
4/9
पहिलं कारण म्हणजे टीम इंडियाकडे जवळपास 8 व्या खेळाडूपर्यंत चांगली बॅटींग लाईनअप आहे. विशेष म्हणजे नुसती बॅटींग लाईन नाही तर हिटींग मशीन आहे.त्यामुळे कोणताही सामना सहज काढू शकतील असे खेळाडू आहेत. पण आज हे सगळेच खेळाडू फ्लॉप ठरले आहेत.त्यामुळे टीम इंडियाने हा सामना गमावला आहे.
advertisement
5/9
आफ्रिकेविरूद्ध सामन्यात अक्षर पटेला बाहेर बसवून वॉशिंग्टन सुंदरला संघात घेऊन सूर्याने मोठी चूक केली. कारण वॉशिंग्टन सुंदर 2 ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या. त्यानंतर तो फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही आणि 11 धावांवर बाद झाला.
advertisement
6/9
टीम इंडियाच्या गोलंदाजी बद्दल बोलायचं झालं तर वरूण चक्रवर्ती, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे सपशेल अपयशी ठरले आहेत. हार्दिक पांड्याने 4 ओव्हरमध्ये 45 धावा देऊन एकही विकेट काढली नाही. वरूण चक्रवर्तीने 4 ओव्हरमध्ये 47 धावा देऊन फक्त एक विकेट काढली. शिवम दुबने 2 ओव्हरमध्ये 32 धावा दिल्या.
advertisement
7/9
पॉवरप्लेनंतर डेविड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविसने गेम फिरवला होता. कारण दोघांनी मिळवून 7 ते 13 या सहा ओव्हरमध्ये 87 धावा काढल्या आणि एक विकेट गमावली होती. क्रिकेटमध्ये असे म्हणतात जो संघ 7 ते 13 या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करतो तो संघ हमखास सामना जिंकतो. त्यामुळे आता या सहा ओव्हरने निकाल फिरवला आहे.
advertisement
8/9
शेवटच आणि मोठं कारण म्हणजे टीम इंडियाने या सामन्यात 11 अतिरीक्त धावा दिल्या होत्या. त्यासोबत अनेक ठिकाणी मिस फिल्डींग दखील केली होती.
advertisement
9/9
या पाच कारणामुळे टीम इंडियाचा आफ्रिकेने पराभव केला आहे.तसेच या विजयाने आफ्रिकने कॅप्टन सूर्याकडून त्या वर्ल्डकप फायनलमधील मॅच विनिंग कॅचचा बदला घेतला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : आफ्रिकेने सूर्याच्या 'त्या' कॅचचा बदला घेतला, अहमदाबादने भारताला पुन्हा रडवले; 5 चक्रव्यूहने केला टीम इंडियाचा पराभव