IND vs PAK : टीम इंडियाची 'ब्रम्हास्त्र' तयार... कॅप्टन सूर्याने घेतली तिघांची नावं, पाकिस्तानला थेट इशारा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 93 रननी दणदणीत विजय झाला आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधला भारताचा हा दुसरा विजय आहे. याचसोबत ग्रुप ए च्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय टीम अव्वल स्थानावर पोहोचली आहे.
advertisement
1/5

आधी युएसए आणि त्यानंतर नामिबियाचा पराभव केल्यानंतर आता टीम इंडियाचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. रविवार 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर ही हाय व्होल्टेज लढत रंगेल.
advertisement
2/5
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानने आतापर्यंत एकदाच भारताचा पराभव केला आहे. 2025 मध्ये झालेल्या आशिया कप टी-20 स्पर्धेच्या तिन्ही मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती.
advertisement
3/5
आता टी-20 वर्ल्ड कपमधल्या सामन्याआधी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला इशारा दिला आहे. टीम इंडियाचे दोन खेळाडू पुढच्या सामन्यासाठी तयार असल्याचं सूर्यकुमार यादव मॅचनंतर म्हणाला आहे.
advertisement
4/5
श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी ही स्पिन बॉलिंगला मदत करते, त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय टीममध्ये बदल व्हायची शक्यता आहे.
advertisement
5/5
वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या दोन स्पिनरशिवाय कुलदीप यादव किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो. या दोघांपैकी एकाला खेळवायचं असेल तर रिंकू सिंगला बाहेर ठेवलं जाऊ शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : टीम इंडियाची 'ब्रम्हास्त्र' तयार... कॅप्टन सूर्याने घेतली तिघांची नावं, पाकिस्तानला थेट इशारा!