IND vs NZ Final : चॅम्पियन्स अगेन! टीम इंडियाचे ऐतिहासिक विजेतेपद; घरच्या मैदानावर विश्वविजेतेपद डबल धमाका
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
हा सामना जिंकून भारताने तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. तसेच याआधी कोणत्याही देशाने सलग दोन वर्ल्डकप जिंकले नव्हते.पण भारताने आज ही किमया करून दाखवली आहे.
advertisement
1/9

भारताने दिलेल्या 255 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडकडून टीम सायफर्ट आणि फिन अॅलेन मैदानात उतरले होते. यावेळी दोघे सेमी फायनल सारखे खेळी करतील अशी अपेक्षा होती.
advertisement
2/9
पण अक्षर पटेलमुळे भारताला पहिली विकेट मिळाली.अक्षर पटेलने न्यूझीलंडचा घातक फलंदाज असलेल्या फिन अॅलेनला 9 धावांवर स्वस्तात बाद केले होते. त्याच्यानंतर रचिन रविंद्र मैदानात आला होता.पण बुमराह समोर त्याचाही निभाव लागला नाही आणि तो एक धावा करून बाद झाला.
advertisement
3/9
रचिन रविंद्र बाद होताच ग्लेन फिलिप्स मैदानात आला. पण तो डाव सावरेल असे वाटत असताना अक्षरने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मार्क चॅपमन मैदानात आला पण त्याला हार्दिक पांड्याने क्लिन बोल्ड करून माघारी धाडले होते.
advertisement
4/9
न्यूझीलंडचे एकाबाजूने एक विकेट पडत असताना टीम सायफर्टनने डाव सावरला होता. पण नंतर वरूण चक्रवर्तीने त्याला ईशान किशनच्या हातात कॅच आऊट केले होते.
advertisement
5/9
न्यूझीलंडचे पाच विकेट पडल्यानंतरही चाहत्यांना एका गोष्टीची प्रचंड भीती वाटत होती. ती म्हणजे डेरी मिचेल.कारण हा खेळाडू अनेकदा टीम इंडियाच्या विजयाच्या आड आला आहे. पण या खेळाडूला देखील अक्षर पटेलने पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.
advertisement
6/9
दरम्यान नंतर बुमराहने भेदक गोलंदाजी करत एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट काढले होते. मॅट हेन्री आणि जेमी निशमची त्याने विकेट काढली होती.
advertisement
7/9
बुमराहने त्यानंतर आणखी एक विकेट काढली आणि मिचेल सँटनरला बाद केले. त्यानंतर अभिषेक शर्माने जेकब डफीची विकेट काढून न्यूझीलंडला 159 धावांवर ऑल आऊट झाले होते.त्यामुळे भारताने हा सामना 96 धावांनी जिंकला होता.
advertisement
8/9
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाकडून संज्यू सॅमसनने सर्वाधिक 46 बॉलमध्ये 89 धावांची खेळी केली होती.त्याच्यासोबत अभिषेक शर्माच्या 52 आणि ईशान किशनच्या 54 तर शिवम दुबेने 8 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली होती. या बळावर भारताने 5 विकेट गमावून 255 धावा केल्या होत्या.
advertisement
9/9
हा सामना जिंकून भारताने तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. तसेच याआधी कोणत्याही देशाने सलग दोन वर्ल्डकप जिंकले नव्हते.पण भारताने आज ही किमया करून दाखवली आहे. यजमान टीमला आतापर्यंत वर्ल्डकप जिंकता आला नव्हता. पण भारताने ही गोष्ट देखील करून दाखवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final : चॅम्पियन्स अगेन! टीम इंडियाचे ऐतिहासिक विजेतेपद; घरच्या मैदानावर विश्वविजेतेपद डबल धमाका