TRENDING:

गायब झाली होती भारतातील ही 10 शहरं; अचानक मिळाले पुरावे आणि उलगडलं नवं रहस्य

Last Updated:
काही शहरं अशी आहेत जी अडीच हजार वर्षे जुनी असूनही जगाला संपूर्णपणे नियोजित शहरांचं प्रमाण दिलं, तर काहींनी दुर्मिळ वास्तुकलेचा दाखला दिला.
advertisement
1/10
गायब झाली होती भारतातील ही 10 शहर; अचानक मिळाले पुरावे आणि उलगडलं नवं रहस्य
विजयनगर हे शहर उत्तर कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेला वसलेले आहे. हे शहर हंपी येथील प्रसिद्ध युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावरील विरुपाक्ष मंदिराजवळ वसले आहे. हरवलेले भारतीय शहर विजयनगर साम्राज्याच्या काळात शिखरावर होते. येथे सापडलेले काही अवशेष सुमारे 300 ईसापूर्व काळातील आहेत. या शहराचे वर्णन रामायणात किष्किंधा वानर देवतांचा प्रदेश असं केलं आहे.
advertisement
2/10
केरळमधील पेरियार नदीच्या काठावरील मुझिरिस शहर. हे भारतातील हरवलेल्या प्राचीन भारतीय शहरांपैकी एक आहे जे उत्खननादरम्यान सापडलं. पुरातत्वशास्त्रज्ञांना इजिप्त, येमेन, रोमन आणि पश्चिम आशियासारख्या देशांशी संबंधित कलाकृती सापडल्या आहेत, ज्याचा पुरावा आहे की भारत या देशांशी व्यापार करत असे.
advertisement
3/10
गुजरातच्या कच्छमधील रापर तालुक्यात सुरकोटाडाचे पुरावे सापडले आहेत. हे देखील सिंधू संस्कृतीचं हरवलेलं शहर आहे. 1964 मध्ये याचा शोध लागला. येथील प्राचीन ढिगारे आणि अवशेष लाल लॅटराइट मातीनं झाकलेल्या वाळूच्या टेकड्यांनी लपलेले आहेत.
advertisement
4/10
नागार्जुनकोंडा हे आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील नागार्जुन सागर धरणाच्या मध्यभागी असलेलं बेट. ही इक्ष्वाकु राजघराण्याची पूर्वीची राजधानी होती. उत्खननात बौद्ध अवशेष, स्तूप, विहार, चैत्य, स्तंभ असलेले मंडप आणि बुद्धांच्या जीवनाचे असंख्य पांढरे संगमरवरी चित्रण दिसून आले आहे.
advertisement
5/10
सांची, भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक. अशोक स्तंभ आणि ग्रीको-बौद्ध शैलीतील स्तूपांसाठी ओळखलं जातं. यात जातक कथा आणि बुद्धाच्या जीवनातील कथांमधील विविध दृश्यं दर्शविली आहेत. भारतातील एकेकाळी हरवलेल्या शहरात, बुद्धांचे अवशेष काचेसारखे चमकण्यासाठी मौर्यकालीन पॉलिशने रंगवले गेले.
advertisement
6/10
भगवान श्रीकृष्णाची नगरी द्वारका आज समुद्रात बुडाली आहे. असं म्हटलं जातं की हे शहर एकूण 6 वेळा समुद्रात बुडालं होतं, परंतु हे शहर अजूनही संरक्षित आहे. कार्बन डेटिंगच्या आधारे असं म्हटले जाते की हे शहर 1500 ईसा पूर्वमध्ये वसलं होतं.
advertisement
7/10
गुजरातच्या कच्छमधील भचाऊ तालुक्यातील खदिर बेटमध्ये लपलेले सिंधू संस्कृती धोलाविरा शहर. आजच्या नियोजनाला आव्हान देणाऱ्या या सुनियोजित शहरात अनेक साईट्स आहेत. येथील उत्खननात सील, मोती, प्राण्यांची हाडं, सोनं, चांदी, टेराकोटाचे दागिने आणि भांडी मिळाली आहेत.
advertisement
8/10
गुजरातमध्ये स्थित लोथल हे सिंधू संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचे हरवलेलं शहर किंवा बंदर आहे. पुराने शहरातील सर्व खुणा पुसून टाकल्या होत्या, परंतु उत्खननानंतर इथं विहिरी, भिंती, स्नानगृहे, नाले आणि काँक्रीटचे मजले यांसारख्या रचना अजूनही दिसतात.
advertisement
9/10
सर्वात प्रसिद्ध शहरे ही सिंधू संस्कृतीतील सर्वात जुनी शहरे आहेत. राखीगढी ही त्या काळातील सर्वात मोठी वस्ती आहे. राखीगढीचे पुरावे हरियाणा राज्यातील हिस्सार जिल्ह्यातून सापडले आहेत.
advertisement
10/10
राजस्थानमधील हनुमान गडामध्ये कालीबंगणचे पुरावे आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे माजी महासंचालक बी.बी. लाल म्हणाले,
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
गायब झाली होती भारतातील ही 10 शहरं; अचानक मिळाले पुरावे आणि उलगडलं नवं रहस्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल