Weird : भारतातील असं गाव जिथं लग्न करणं मुश्किल काम; कारणही शॉकिंग
- Published by:Priya Lad
Last Updated:
एखाद्याचं लग्न जुळत नाही इतपत ठिक आहे पण असं गाव जिथं लग्न होणं मुश्किल आहे, याबाबत आश्चर्य वाटेल.
advertisement
1/5

उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्याच्या रजवारा गावात पुरुष कमी आणि महिला जास्त आहेत. इथं सर्वाधिक महिला विधवा आहेत. या गावात क्वचितच असं घर असेल जिथं कुणी विधवा महिला नाही.
advertisement
2/5
महिला विधवा होण्याचं कारणही शॉकिंग आहे. या गावातील पुरुषांचं सरासरी वय 20 ते 40 वर्षेच राहिलं आहे.
advertisement
3/5
पुरुषांचं वय कमी होण्यास कारण आहे ते दारू. या गावात प्रत्येक घरात कच्च्या दारूच्या भट्ट्या आहेत. यामुळे तरुण, वृद्ध, लहान मुलंही नशेच्या आहारी गेले आहेत. या गावातील दिवसाची सुरुवातच दारूपासून होते. ज्यामुळे गावातील वातावरणच वेगळं असतं.
advertisement
4/5
त्यामुळे या गावात कोणीच आपली मुलगी लग्न करून पाठवायला तयार होत नाहीत. कारण लग्नानंतर ती विधवा होईल, असं वाटतं.
advertisement
5/5
त्यामुळे कुणी गरीब किंवा मजबूरच या गावात आपल्या मुलीचं लग्न करण्यासाठी तयार होतात.