TRENDING:

Vidhan Parishad Election : विधान परिषदेत भाजपची हवा, पंकजा मुंडेंसह आणखी 2 उमेदवार विजयी

Last Updated:

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पूर्ण झालं आहे. आता एकएक निकाल समोर येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
bjpमुंबई : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. संध्याकाळी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत विधानसभेतील सक्रिय 274 आमदारांनी गुप्त मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहेत. भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला आहे.
News18
News18
advertisement

भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर आणि परिणय फुके विजयी झाले आहेत.

कसा ठरतो मतदानाचा कोटा?

विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधानपरिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक 1 या पद्धतीनं मतदानाचा कोटा ठरतो. राज्यात विधानसभेच्या एकूण जागा 288 आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता हे संख्याबळ 274 वर आलं आहे. विधानसभेच्या एकूण जागा 274 जागांचा रिक्त जागा 11 +1 म्हणजेच 12 ने भागाकार केला तर 22.833 हे उत्तर येतं. त्यामुळे विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

advertisement

पक्षीय बलाबल कसं होतं?

महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. भाजपाचे 103 आमदार असून अपक्ष आणि मित्रपक्ष मिळून 111 संख्या होते. भाजपानं 5 जणांना उमेदवारी दिली आहे. त्यांचं संख्याबळ पाहात हे सर्व उमेदवार सहज निवडून येतील अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे 38 आमदार आहेत. त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांच्या पक्षाच्या 2 अशा 9 आमदारांचा पाठिंबा आहे. महायुतीतील तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) 39 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मताचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना 7 आमदारांची गरज होती.

advertisement

वाचा - Vidhan Parishad Election : पंकजा मुंडेंना किती मतं पडली? पहिले आकडे आले समोर

महाविकास आघाडीकचं काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

काँग्रेसचे 37 आमदार आहेत. या संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसचा एक उमेदवार नक्की विजयी होईल. त्यानंतरही काँग्रेसकडं 14 मतं शिल्लक राहतील. ही मतं निर्णायक होती. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा होता. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 13 आमदार आहेत. तर शेकापचा 1 आमदार आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 उमेदवार रिंगणात असून त्यांचे 15 आमदार आहेत. त्यामुळे ठाकरेंचे मिलींद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांना मतांची गरज होती.

advertisement

मराठी बातम्या/Politics/
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत भाजपची हवा, पंकजा मुंडेंसह आणखी 2 उमेदवार विजयी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल