अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमान कोसळून निधन झालं. अजितदादा VSR या खासगी कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. मुंबईहून बारामती येत असताना सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ज्या VSR कंपनीचं हे विमान होतं, त्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थितीत झाले. या प्रकरणीची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयांतर्गत असलेली AAIB ही संस्था तपास करत आहे.
advertisement
आता या प्रकरणाच्या तपासात नवी माहिती समोर आली आहे. विमानाच्या एअरवर्थिनेस म्हणजेच हवाई प्रवासक्षमता आणि विमानाची उड्डाण योग्यतेबाबत तपास होणार आहे. DGCA कडून विमानाच्या एअरवर्थिनेस आणि ऑपरेशनल कंडीशन याबाबत समांतर चौकशी सुरू झाली आहे. तपासाअंती "ते" विमान उडण्यासाठी सुरक्षित होतं का याबाबत स्पष्टता येणार आहे.
या तपासणीला पुढील १० ते १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणेकडून खाजगी विमान कंपनीच्या विविध कागदपत्रांचीही पडताळणी होणार आहे.
विमान अपघाताचा तपास कुठपर्यंत आला?
दरम्यान, विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. VSR कंपनीबद्दलही गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणाची रोहित पवार आंतराष्ट्रीय गुप्तहेर संस्थेकडूनही तपास करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर या विमानाचा ब्लॅक बॉक्स हा AAIB ने ताब्यात घेतला आहे. ब्लॅक बॉक्समधील माहिती काढण्याचं काम सुरू आहे. पण, डेटा येण्यास उशीर होणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे VSR Ventures या विमान कंपनीची देखील चौकशी सुरू आहे.
मागील आठवड्यात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, लवकरच प्राथमिक अहवाल समोर येईल, असं आश्वासन दिलं आहे.
