तर दुसरीकडे, या उत्तर पत्रिका निकाली काढण्यासाठी संकलित करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार अधिकार मंडळामार्फत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कोणत्याही सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व उत्तर पत्रिका मूल्यमापन आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाली काढण्याची प्रक्रिया केली जाते. सध्या त्या उत्तरपत्रिका निकाली काढण्याची कार्यवाही सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले आहेत.
advertisement
या अंतर्गत उत्तर पत्रिका ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व उत्तरपत्रिका सध्याच्या नसून गेल्या दहा वर्षातल्या असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दहा वर्षातल्या निरस्त करण्यासाठी काढलेल्या जुन्या उत्तरपत्रिकांचे हे गठ्ठे आहेत. त्या निरस्त करायचं कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आलेले आहे. कंत्राटदाराला देण्यात आलेल्या कंत्राटाच काम येत्या पावसाळ्यापर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. परंतु आलेल्या अवकाळी पावसामुळे सर्व जुन्या पेपरवर पाणी फिरलं आहे. अवकाळी पावसामुळे फक्त सामान्य नागरिकांचीच नाही तर, सर्वांचीच तारांबळ उडाली आहे.
दरम्यान, काल सायंकाळी पुण्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे खोलगट भागांमध्ये पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यामधून पुणेकरांनी रस्ता काढला. फक्त वाहनचालकांचीच नाही तर, रस्त्याने चालणाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान, काल सायंकाळी शहरातील अनेक रस्त्यांवर गारांचा खच पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. दरम्यान, राज्यामध्ये पावसाचे वातावरण पुढचे काही दिवस अशीच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आता घराबाहेर पडताना छत्री सुद्धा घेऊन निघावं लागणार आहे.
