राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यावर उन्हाळी सुट्ट्या सुरू होतात. त्यानंतर पर्यटनासाठी राज्यात आणि परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. यातील बहुसंख्य प्रवासी हे सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी रेल्वेलाच पहिली पसंती देतात. त्यामुळे उन्हाळी गाड्यांचे ऑनलाईन बुकिंग सुरू होताच ते अवघ्या काही दिवसांत वेटिंगवर जाते.
Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक भोवली, तरूणाला अटक
advertisement
उत्तर आणि मध्य भारतात जाणाऱ्या गाड्यांसह पर्यटन स्थळ परिसरातून जाणाऱ्या गाड्यांना या काळात मोठी गर्दी असते. विशेष म्हणजे या गाड्यांचे वेटिंग काही काळातच 200 ते 400 पर्यंत जाते. प्रवाशांना नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.
महाराष्ट्रात धावणाऱ्या गाड्या
दरम्यान, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून 1 हजार 484 उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येतील. त्यामध्ये मुंबई / दौंड सोलापूर, पुणे - कोल्हापूर, नाशिक रोड- बडनेरा आणि हडपसर- हरंगुळ दरम्यानच्या गाड्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राबाहेरील गाड्या
महाराष्ट्राबाहेरील ठिकाणांसाठी विशेष रेल्वे सेवांमध्ये मुंबई- बलिया, मुंबई- गोरखपूर, दौंड- कलबुर्गी आणि सोलापूर- कलबुर्गी / अनकापल्ली दरम्यानच्या गाड्यांचा समावेश असेल. प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
