TRENDING:

Alandi: 456 वर्षांपूर्वीचा ‘तो’ दरवाजा, 30 कारागीर नव्याने बनवणार, ज्ञानेश्वर माऊलींशी थेट कनेक्शन

Last Updated:

Dnyaneshwari Mauli: याच दरवाजातून निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताई यांनी माऊलींना अंतिम निरोप दिला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. आता येथील सुमारे साडेचारशे वर्षे जुन्या पश्चिमाभिमुख दरवाजाचं रुपडं पालटणार आहे. या कार्यासाठी विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज तसेच समाजसेवी मंडळांनी पुढाकार घेतला आहे. मंदिर समितीची अधिकृत परवानगी घेऊन हे काम करण्यात येणार असून, समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने शुद्ध सागवानी लाकडातून नवीन दरवाजा तयार करण्यात येणार आहे.
Alandi: 456 वर्षांपूर्वीचा ‘तो’ दरवाजा, 30 कारागीर नव्याने बनवणार, ज्ञानेश्वर माऊलींशी थेट कनेक्शन
Alandi: 456 वर्षांपूर्वीचा ‘तो’ दरवाजा, 30 कारागीर नव्याने बनवणार, ज्ञानेश्वर माऊलींशी थेट कनेक्शन
advertisement

456 वर्षे जुना पान दरवाज्याला नव रूप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध कारागीर प्रल्हाद आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 30 कुशल कारागीर या दरवाजाच्या निर्मितीचे काम करत आहेत. या कामासाठी अंदाजे सहा ते सात लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सुमारे 700 किलो सागवानी लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रकडून खरेदी करण्यात आले आहे. यासाठी श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज सेवा मंडळाकडून 3 लाख 53 हजार 737 रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्या 12 फूट उंची आणि 8 फूट रुंदीच्या दरवाजाचे काम सुरू आहे.

advertisement

Pune: उत्खनन झालं, सापडला 12 लाख वर्षांआधीचा पुरावा! डेक्कन कॉलजेच्या संशोधन विभागाचा Video

इतिहासाची साक्ष देणारा पान दरवाजा..

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांनो, साखर कारखान्यांतील वजनकाट्यांबाबत शंका? अशी करा वेळीच तक्रार, Video
सर्व पहा

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराच्या पश्चिम बाजूस, इंद्रायणी नदीकडे असलेला पान दरवाजा हा मंदिरातील अत्यंत महत्त्वाचा दरवाजा आहे. याच दरवाजातून माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांना प्रवेश दिला जातो. मंदिराच्या मुख्य प्रदक्षिणा मार्गाशी जोडलेला असल्याने येथे दररोज मोठी वर्दळ असते. इतिहासानुसार, याच दरवाजातून निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताई यांनी माऊलींना अंतिम निरोप दिला होता. 1570 मध्ये बांधलेल्या मंदिराच्या प्रमुख प्रवेशद्वारांपैकी हा दरवाजा असून, सुमारे 456 वर्षे जुन्या या दरवाजाच्या रचनेप्रमाणेच नवीन दरवाजा तयार करण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Alandi: 456 वर्षांपूर्वीचा ‘तो’ दरवाजा, 30 कारागीर नव्याने बनवणार, ज्ञानेश्वर माऊलींशी थेट कनेक्शन
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल