प्रकरण काय?
केशवनगर परिसरात राहणाऱ्या एका ब्युटी पार्लर चालिका महिलेच्या गर्भाशयात छोटी गाठ असल्याचे सोनोग्राफीत आढळले होते. उपचारासाठी त्या १५ सप्टेंबर २०२५ रोजी साई केअर हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. मात्र, डॉक्टरांनी महिलेची किंवा त्यांच्या नातेवाईकांची कोणतीही पूर्वसंमती न घेता शस्त्रक्रिया करून तिचे संपूर्ण गर्भाशयच काढून टाकले. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित महिलेने मांजरी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
advertisement
तपासात धक्कादायक वळण
सरकारी वकील अॅड. विश्वास सातपुते यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. "काढलेल्या गर्भाशयाचे या डॉक्टरांनी नेमके काय केले? ही अवयव तस्करी आहे का? की यामागे काही मोठा कट आहे?" असे गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले. बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानेही या डॉक्टरांनी उपचारात अक्षम्य निष्काळजीपणा केल्याचा अहवाल दिला आहे. यावरून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख आणि डॉ. मोहम्मद शेख या चौघांचा जामीन फेटाळला आहे.
या घटनेमुळे खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त केला जात असून, आता या डॉक्टरांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे
