प्रवासादरम्यान काय झाले?
पुणे ते दिल्ली या 32 तासांच्या प्रवासात एका व्यक्तीने या तरुणीला प्रचंड अस्वस्थ केले. पीडित तरुणीने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती तिच्याच डब्यात होती आणि तो सतत तिच्याकडे एकटक पाहत होता. तो केवळ पाहतच नव्हता, तर विचित्र चेहरे करणे, अश्लील हावभाव करणे आणि तिला फोन करण्यासारखे इशारे (Phone-call gesture) करत होता. तरुणीने या व्यक्तीचा एक छोटा व्हिडिओ देखील बनवला आहे, ज्यामध्ये तो वरच्या बर्थवर लॅपटॉप घेऊन बसलेला दिसतोय आणि तिच्याकडे एकटक पाहतोय.
advertisement
घबराट आणि कुटुंबीयांचा सल्ला
तरुणीने सांगितले की, मी बसलेली असो, झोपलेली असो किंवा काहीही करत असो, तो माणूस नजर हटवत नव्हता. घाबरलेल्या अवस्थेत तिने हा व्हिडिओ आपल्या आईला आणि बहिणीला पाठवला. मात्र मुलीच्या सुरक्षेची काळजी वाटल्याने आईने तिला त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करण्याचा आणि वाद न घालण्याचा सल्ला दिला. शेवटी काय करावे हे न सुचल्याने तिने हा अनुभव Reddit वर शेअर केला आणि लोकांकडे मदत मागितली.
पोस्ट व्हायरल होताच लोकांनी दिले सल्ले
तक्रार करण्याचा सल्ला: काही युजर्सनी तिला तात्काळ RPF (रेल्वे सुरक्षा दल) कडे तक्रार करण्यास सांगितले. तसेच X वर भारतीय रेल्वेला टॅग करून मदत मागण्याचा उपाय सुचवला. त्यांनी सांगितले की, रेल्वे अशा तक्रारींची गंभीर दखल घेते आणि पुढील स्टेशनवर तातडीने मदत पोहचवते.
सुरक्षेसाठी मौन पाळण्याचा सल्ला: काही लोकांनी तिच्या आईच्या मताचे समर्थन केले. प्रवासात एकटे असताना अशा लोकांशी वाद घालणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे सुरक्षितपणे उतरण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सुचवले.
Had a creep encounter
सहप्रवाशांची मदत आणि शेवट
या घटनेनंतर तरुणीने एक 'अपडेट' शेअर केले. जेव्हा तिला खूप अस्वस्थ वाटू लागले, तेव्हा तिने डब्यातील इतर प्रवाशांना (दोन महिला आणि दोन पुरुष) हा प्रकार सांगितला.
त्या महिलांनी तिला धीर दिला आणि ती रेल्वेतून उतरल्यानंतर टॅक्सी मिळेपर्यंत तिच्यासोबत थांबण्याचे आश्वासन दिले. ती महिला गेल्यानंतर डब्यातील एका सरदारजीने तरुणीला रिक्षात सुरक्षितपणे बसवले .
हा अनुभव शेअर करताना तरुणीने म्हटले की, या जगात दोन्ही प्रकारचे लोक आहेत. एकीकडे असे विकृत लोक आहेत जे तुमच्याकडे टक लावून पाहतात आणि दुसरीकडे त्या सरदारजींसारखी माणसेही आहेत, जी अनोळखी असूनही तुमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शेवटपर्यंत थांबतात.
