पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रांच्या परिसरात तसेच त्या केंद्रांभोवती 100 मीटर अंतराच्या क्षेत्रात कोणत्याही अनधिकृत व्यक्तींना प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच परीक्षा केंद्राच्या परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यासही मनाई करण्यात आली आहे. मात्र, परीक्षा देणारे विद्यार्थी, परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
advertisement
दहावी आणि बारावी परीक्षार्थींना मिळणार 10 मिनिटात मदत, ठाणे ट्रॅफिक पोलिसांची रायडर्स सज्ज
या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
परीक्षा काळात केंद्रांभोवती सुरक्षा कडक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात सर्वसामान्य व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याचबरोबर, या परिसरातील सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी-आयएसडी बूथ, फॅक्स केंद्रे, झेरॉक्स सेंटर, ई-मेल, इंटरनेट सुविधा आणि त्याच प्रकारची इतर कोणतीही साधने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.
परीक्षा केंद्राच्या परिसरात आणि त्यासभोवतालच्या 100 मीटरच्या अंतरात मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, रेडिओ, कॅलक्युलेटर, लॅपटॉप यांसारखी साधने जवळ बाळगणे किंवा वापरणे पूर्णपणे मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 223 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.






