८ तासांच्या कोंडीनंतर 'एअरलिफ्ट'
डॉ. सुधीर मेहता (प्रमुख, EKA मोबिलिटी आणि पिनॅकल इंडस्ट्रीज) पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना या भीषण कोंडीत अडकले. तासनतास वाट पाहूनही मार्ग मोकळा होत नसल्याने, एविएशन कन्सल्टंट नितीन वल्डे यांच्या मदतीने त्यांना हेलिकॉप्टरद्वारे 'एअरलिफ्ट' करून सुरक्षितपणे पुण्यात पोहोचवण्यात आले. या घटनेनंतर मेहता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक्सप्रेसवेवरील विदारक परिस्थितीचे फोटो शेअर करत प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवले.
advertisement
प्रशासकीय अपयशावर ओढले ताशेरे
"हजारो प्रवासी, लहान मुले आणि वृद्ध अन्नापाण्याविना अडकले आहेत, पण त्यांच्या सुटकेसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही," अशी खंत डॉ. मेहता यांनी व्यक्त केली. त्यांनी प्रशासनाकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. एक म्हणजे इमर्जन्सी एक्झिट, एक्सप्रेसवेवर ठराविक अंतरावर आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग असावेत, जेणेकरून अशी स्थिती उद्भवल्यास वाहने वळवता येतील. तर दुसरी म्हणजे हेलिपॅडची निर्मिती, आपत्कालीन रेस्क्यूसाठी महामार्गाच्या कडेला कमी खर्चात हेलिपॅड्स उभारण्यात यावेत. अशी मागणी त्यांनी केली.
सर्वसामान्यांचे अतोनात हाल
टँकरमधील गॅस गळती थांबवताना एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाची दमछाक झाली. मात्र, या काळात लहान मुलं आणि आजारी माणसांना जो मनस्ताप सहन करावा लागला, तो भीषण होता. उद्योगपतींना हेलिकॉप्टरने बाहेर पडता आले, पण 'हजारो सर्वसामान्यांचं काय?' हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
