श्रीरंग बारणे यांच्या जमेच्या बाजू
नेत्यांशी संपर्क
स्वच्छ प्रतिमा
भाजपमधून लढण्याची तयारी
कमकुवत बाजू
जनसंपर्क तुटला
मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यात अपयश
मतदार संघातील पर्यटन स्थळ विकास दुर्लक्षित
सुनील शेळके, राष्ट्रवादी जमेच्या बाजू
अजित पवारांचे कट्टर समर्थक
मतदारसंघात चांगला जनसंपर्क
कमकुवत बाजू
लोकसभा लढण्याचा अनुभव नाही
भाजप नेत्यांची नाराजी
सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहे. यातच आता सर्व राजकीय पक्षांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळविला आहे. यामध्ये सध्या महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा प्रत्येक पक्षासाठी केंद्र बिंदू बनला आहे, तो म्हणजे बारामती लोकसभेसाठी. बारामतीत नणंद भावजया एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे मावळ देखील तितकाच महत्वाचा विषय आहे. एकीकडे श्रीरंग बारणे हे पुन्हा मीच मावळ मधून लोकसभेवर निवडून जाणार असल्याचा विश्वास दाखवत आहे. दुसरीकडे मावळ मधून मित्र पक्षात सारंकाही आलबेल आहे का? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. तर उबाठा गटाचाच उमेदवार हा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमधे आहे.
advertisement
वाचा - राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, नाना पाटेकरांना राष्ट्रवादीकडून ऑफर? कोल्हेंचा करणार गेम?
गेल्या दहा वर्षात मावळातील कोणतेही असे गाव नाही की ज्यामध्ये श्रीरंग बारणे यांनी निधी दिला नाही. त्यामुळे पुन्हा श्रीरंग बारणे हेच महायुतीमधून निवडून येईल असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आरोप प्रत्यारोपांमध्ये विजय कुणाचा होणार? हे आता येत्या काही दिवसांत समोर येणार आहे.