होळी हा कोकणातील मोठा आणि जिव्हाळ्याचा सण. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो खासगी वाहने आणि एसटी बसेस मुंबईतून कोकणाकडे रवाना झाल्या आहेत. आज सकाळपासूनच माणगाव बाजारपेठ आणि इंदापूर परिसरात वाहनांचा वेग मंदावला आहे. अरुंद रस्ते आणि वाढलेली वाहनसंख्या यामुळे प्रवाशांना तासनतास एकाच जागी थांबून राहावे लागत आहे.
Nashik News: प्रवाशांनी भरलेलं विमान; अचानक एअरहोस्टेसची तब्येत बिघडली अन्... नाशकात काय घडलं?
advertisement
आज शनिवार असल्यामुळे प्रवाशांचा ओघ वाढला आहे. हीच परिस्थिती पुढील तीन दिवस म्हणजे धुळवडीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. होळीच्या उत्सवासाठी निघणाऱ्या प्रवाशांनी वेळेचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन आणि महामार्ग पोलिसांनी कंबर कसली आहे. महत्त्वाच्या नाक्यांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवून लहान वाहनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मात्र, वाहनांचा ओघ पाहता प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे.
