काय आहे प्रकरण?
२८ वर्षीय विवाहित फिर्यादी महिलेने रितेश सुनील जाधव (वय २३) याच्याविरोधात १६ फेब्रुवारी रोजी बलात्काराची फिर्याद दिली होती. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या ८ महिन्यांपासून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला होता. याप्रकरणी रितेशने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी या प्रकरणातील सर्व बाजू ऐकून घेतल्यावर सांगितले की, फिर्यादी ही एक प्रौढ आणि विवाहित महिला आहे. तिला आपल्या कृतीचे काय परिणाम होतील, याची पूर्ण जाणीव आहे. अशा परिस्थितीत २३ वर्षीय तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिने त्यावर विश्वास ठेवला, हे तर्कसंगत वाटत नाही.
advertisement
वकिलांचा युक्तिवाद
तरुणातर्फे ॲड. आकाश सुधीर चव्हाण यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, "दोघांमध्ये गेल्या ८ महिन्यांपासून शारीरिक संबंध होते आणि त्यात कोणतीही जबरदस्ती नव्हती. हे संबंध पूर्णपणे परस्पर संमतीने झाले होते. जेव्हा वाद झाला, तेव्हा 'लग्नाचे आमिष' हा आरोप लावून गुन्हा दाखल करण्यात आला." ॲड. चव्हाण यांना ॲड. श्रुती रमेश कुंभार यांनी सहकार्य केले.
न्यायालयाने हे मान्य केले की, जर एखादी व्यक्ती परिणामांची जाणीव असताना वारंवार संबंध ठेवत असेल, तर त्याला केवळ आमिषाचे नाव देऊन बलात्काराचा गुन्हा ठरवता येणार नाही. परिणामी, रितेश जाधव याची अटक न्यायालयाने रोखली आहे.
