वनराज आंदेकर याचा खून का झाला?
वनराज आंदेकर याचा खून हा केवळ वैयक्तिक कारणातून झालेला नाही. कौटुंबिक संपत्तीवरून असलेले जुने वाद, टोळी युद्ध आणि परिसरातील आर्थिक वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा कट रचला गेल्याचे स्पष्ट झालं आहे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी न्यायलयात केला. या वर्चस्ववादामुळेच आंदेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं पोलिसांनी तपासात नमूद केलं आहे.
advertisement
आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी, आंदेकरांचे जावई जयंत आणि गणेश याचा समावेश आहे. यासोबतच प्रकाश कोमकर आणि कुख्यात टोळीप्रमुख सोम्या उर्फ सोमनाथ गायकवाड यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपींनी संगनमताने हा हत्येचा कट अंमलात आणल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
आरोपींविरोधातील गुन्हे निश्चित?
सध्याच्या सुनावणीवेळी या प्रकरणाचे तपास अधिकारी आणि बचाव पक्षाचे वकील न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव आरोप निश्चितीची प्रक्रिया होऊ शकली नाही. न्यायालयाने आता पुढील तारीख दिली असून, त्या दिवशी सर्व पक्षांच्या उपस्थितीत आरोपींविरोधातील गुन्हे निश्चित केले जातील, ज्यामुळे प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट होईल.
1700 पानाच्या चार्टशीटमध्ये काय?
दरम्यान, आरोप निश्चितीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. पुणे शहराला हादरवून सोडणाऱ्या या हत्याकांडाचा निकाल काय लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तप 1700 पानाच्या चार्टशीटमध्ये काय काय आहे? असा सवाल देखील उपस्थित होताना दिसतोय.
